शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:16 IST

बाजार अभियानासाठी शेतकऱ्यांना आवाहन लातूर : विकेल ते पिकेल, या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानात ...

बाजार अभियानासाठी शेतकऱ्यांना आवाहन

लातूर : विकेल ते पिकेल, या धोरणांतर्गत संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार या अभियानात जास्तीत जास्त शेतकरी गटातील सदस्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी गटातील शेतकरी जे महामार्गावर, स्वत:च्या स्टॉलवर सहकारी सोसायटीमध्ये, हातगाड्यांवर तसेच आठवडी बाजारामध्ये भाजीपाला, फळे थेट ग्राहकास विक्री करतात, अशा शेतकरी गटातील शेतकरी सदस्यांनी ७ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले योजनेतून उपचार

लातूर : कोरोनामुक्त रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. या आजारावरील उपचाराकरिता मोठा खर्च पडतो. त्यामुळे शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या निर्देशानुसार तीन रुग्णालयांत या योजनेतून म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार दिले जाणार आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, विवेकानंद रुग्णालय या तीन संस्थांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातील.

वाटणीच्या कारणावरून लाथाबुक्क्याने मारहाण

लातूर : जागेच्या वाटणीच्या कारणावरून राहुल नगर, गौसपुरा येेथे मारहाण झाल्याची घटना २६ मे रोजी घडली. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात जाज इलाही सय्यद (रा. राहुल नगर, गौसपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खाजामियाँ उमरसाब शेख व अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना. पाटील करीत आहेत.

भाजपाच्यावतीने गावोगावी सेवा कार्य

लातूर : भारतीय जनता पार्टीच्या वतीने केंद्र शासनाला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोनाच्या अनुषंगाने सेवाकार्य केले जाणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश कराड यांनी दिली. जिल्ह्यातील ५ विधानसभेच्या १२ मंडळातील प्रत्येक गावात भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी भेटी देऊन आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्तींचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करणार आहेत. रक्तदान शिबिर, साफसफाई, स्वच्छता अभियान, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप, तुळशीच्या रोपाचे वाटप, बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत जनजागृती आदी उपक्रम राबविले जात असल्याची माहिती आ. कराड यांनी दिली.