शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

राज्यातील जिल्हा परिषदांतील एक लाख प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 17:01 IST

लातूर : समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लेखाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांची प्रकरणे तात्काळ निकाली निघणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषदांतील एक लाख आक्षेपाची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती पंचायत राज समितीचे प्रमुख आ. सुधीर पारवे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.लातूर जिल्हा परिषदेच्या २०१४- १५ या वर्षाच्या ...

लातूर : समाजातील सर्व घटकांना शासनाच्या योजना मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लेखाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या आक्षेपांची प्रकरणे तात्काळ निकाली निघणे आवश्यक आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषदांतील एक लाख आक्षेपाची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशी माहिती पंचायत राज समितीचे प्रमुख आ. सुधीर पारवे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

लातूर जिल्हा परिषदेच्या २०१४- १५ या वर्षाच्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष झाल्यानंतर ते बोलत होते. पंचायत राज समितीचा प्रमुख म्हणून आतापर्यंत दहा जिल्हा परिषदांची तपासणी केली आहे, असे सांगून पारवे म्हणाले, जिल्हा परिषदांतील काही मुद्दयांवर लेखाधिकाऱ्यांनी नोंदविलेले आक्षेप निकाली काढण्यावर देखरेख ठेवण्याचे काम विभागीय आयुक्तांचे आहे. हे आक्षेप निकाली काढावेत, म्हणून विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. काही प्रकरणांत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे थकबाकी असते. ती वसूल करुन शासनाच्या तिजोरीत जमा केली पाहिजे. त्यामुळे ही रक्कम पुन्हा विविध योजनांसाठी वापरता येईल. त्यातून जिल्ह्यातील विकासकामे गतीमान करणे शक्य होईल. लातूर जिल्ह्यात काही प्रकरणांत अनियमितता आढळली असून ती सुधारण्यासाठी संधी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, समितीचे सदस्य श्रीकांत देशपांडे, दिलीप सोपल, डॉ. सुधाकर भालेराव, समाजकल्याण समिती सभापती संजय दोरवे आदी उपस्थित होते.

टॅग्स :laturलातूर