शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

ऑनलाईच्या डोकेदुखीमुळे ऑफलाईनचा पर्याय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले, तर त्याच्या विम्याचा लाभ मिळावा म्हणून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध बँका, महा ई सेवा ...

खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले, तर त्याच्या विम्याचा लाभ मिळावा म्हणून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विविध बँका, महा ई सेवा केंद्र येथे पीक विम्याचा भरणा केला होता. जून महिन्यात वेळेवर पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पेरण्या वेळेवर झाल्या. यामध्ये एकंदर लागवड क्षेत्राच्या २३ हजार ७०० हेक्टर्समध्ये सोयाबीनचा पेरा करण्यात आला, तर उर्वरित तूर, उडीद, मूग अशी पिके घेण्यात आली आहेत. पेरणीनंतर कित्येक दिवस पावसाने पाठ फिरवली. माळरानावरील पिके करपून गेली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. मागील महिन्यात तर मुसळधार पाऊस पडून अनेकांचे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले. नदीकाठच्या जमिनीत पाणी घुसून उभी पिके पाण्यात गेल्यामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीची माहिती ७२ तासात विमा कंपनीकडे ऑनलाईन नोदणी करून देण्यात यावी. असे आवाहन विमा कंपनीकडून करण्यात आले. पण ऑनलाईन नोंदणीत अडथळ्याची शर्यत पार करता करता शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यानी ऑफलाईन अर्ज दाखल करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

ऑनलाईन नोंदणीस अडथळ्याची शर्यत...

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे ऑनलाईन नोंदणी करून माहिती द्यावी, असे आवाहन विमा कंपनीकडून करण्यात आले होते. परंतु अनेक शेतकऱ्यांकडे ॲन्ड्रॉईड मोबाईल फोनची सुविधा नाही, तर ज्यांच्याकडे मोबाईल फोनची सुविधा आहे. त्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत होती, तर ओटीपी येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. म्हणून तालुक्यातील १ हजार ५००पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात ऑफलाईन अर्ज दाखल केले आहेत.

सरसकट पंचनाम्याची मागणी...

येथील भाजपा तालुका शाखेचे अध्यक्ष मंगेश पाटील यांनी पदाधिकाऱ्यांसह सरसकट पंचनामे करून प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार अतुल जटाळे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.