शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवस बळीराजासाठी; शेतकऱ्यांच्या घरी मुक्कामी राहून अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या अडचणी

By हरी मोकाशे | Updated: September 1, 2022 11:52 IST

राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा नवा उपक्रम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे.

लातूर : शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम गुरुवारपासून सुरु करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने विभागीय कृषी सहसंचालक दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री विविध गावांत शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या. तिथेच मुक्काम करुन गुरुवारी सकाळीही ग्राम संजीवनी समितीच्या बैठका घेत शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या, नैराश्य व त्यातून होणाऱ्या आत्महत्या हे समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा नवा उपक्रम १ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत प्रशासनातील सर्व अधिकारी, विद्यापीठांचे शास्त्रज्ञ हे संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून त्यांना दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी जाणून घेणार आहेत. 

या उपक्रमाअंतर्गत बुधवारी रात्री विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर हे लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने हे उदगीर तालुक्यातील तादलापूर येथे, आत्माचे प्रकल्प संचालक आर.एस. पाटील हे निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे मुक्कामी राहिले होते. तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकारीही निवडलेल्या गावांत मुक्कामी होते. रात्री शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

लक्ष्मण रेषेच्या पुढे जाऊन काम केले पाहिजे...जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी तादलापूर येथे बुधवारी रात्री ११ वा. पर्यंत शेतकऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सरपंच अंबिका अविनाश पाटील, उपसरपंच पंडित दवर्षे, कृषी सहाय्यक वाघमारे, पोखराचे कर्मचारी राठोड यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी गावसाने यांनी कृषीच्या प्रत्येक योजनांची माहिती देऊन आढावा घेतला. तेव्हा शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी मांडल्या. त्यानंतर गावसाने यांनी शेतकरी शिवशंकर पाटील यांच्या घरी मुक्काम केला. गुरुवारी सकाळी ग्रामसंजीवनी समितीची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर