शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

अहमदपूर तालुक्यातील गुऱ्हाळांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:24 IST

अहमदपूर तालुक्यात जलस्रोतांची संख्या वाढली असून, सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे या भागात अधिक पाण्याची पिके घेतली जात ...

अहमदपूर तालुक्यात जलस्रोतांची संख्या वाढली असून, सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे या भागात अधिक पाण्याची पिके घेतली जात आहेत. तालुक्यात उसाचे प्रमाण इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. ज्या परिसरात ऊस क्षेत्र आहे तेथील बहुतांश शेतकरी साखर कारखान्याला आपला ऊस पाठवतात. मागील काही वर्षांपासून उसाच्या रसवंत्या सर्वत्र बहरत चालल्या आहेत. यातून रसवंतीचालकांकडून उसाची मोठी मागणी होत आहे. ऊसतोडणीला आल्यावर जागोजागी उसाच्या रसापासून गूळ तयार करणारे गुऱ्हाळ सुरु केले जात होते. गुऱ्हाळाचा आस्वाद घेण्यासाठी शेतकरी आपल्या पाहुण्यांना आमंत्रित करीत असत. गुऱ्हाळाची लगबग पाहावयास मिळत होती. एकीकडे मजुरांची सुरू असलेली ऊसतोडणी, दुसरीकडे चरकातून काढण्यात येणारा उसाचा रस, बाजूलाच पेटवलेली भट्टी, त्यात एकसारखे टाकण्यात येणारे पाचट, भट्टीवर टाकण्यात आलेली भली मोठी लोखंडी कढई, त्यात उसाचा रस आणि गूळ भेंडी ओतून अगदी उकळी फुटेपर्यंत कवच्याने हलवत सततपणे सुरू असलेले काम. उसाच्या रसाच्या आदणाने कढईत उकळी घेतली की समजा गूळ तयार झाला. उसाचे गुऱ्हाळ अहमदपूर तालुक्यातील हाडोळती शिवारात सुरू आहेत.

शेतकऱ्यांना ऊस लागवड केल्यानंतर

एका एकरमध्ये मध्ये २५ आदण निघत असून, एका आदणाला अडीच क्विंटल गूळ निघतो. तर एकरी सहा टन २.५० किलो गूूळ निघतो. गुऱ्हाळ परवडत असतानाही शेतकरी मात्र आपला ऊस कारखान्याला देऊन मोकळे होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

गुऱ्हाळातील गूळ उच्च प्रतिचा...

ऊस तोडणीसह गुऱ्हाळाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत. एकदा गुऱ्हाळ सुरू झाल्यावर ते बंद होऊ नये म्हणून मजुरी व्यतिरिक्त आगाऊ रक्कम मजुरांना द्यावी लागते. गुऱ्हाळात तयार होणारा गूळ शुद्ध आणि उच्च प्रतिचा असतो. त्यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे अशा गुळाला मोठी मागणी आहे. मात्र गुऱ्हाळांची संख्या रोडावल्याने बाजारात प्रक्रिया केलेल्या गुळाची विक्री होताना दिसत नाही.

- विश्वनाथ हेंगणे, शेतकरी