शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूर तालुक्यातील गुऱ्हाळांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:24 IST

अहमदपूर तालुक्यात जलस्रोतांची संख्या वाढली असून, सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे या भागात अधिक पाण्याची पिके घेतली जात ...

अहमदपूर तालुक्यात जलस्रोतांची संख्या वाढली असून, सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे या भागात अधिक पाण्याची पिके घेतली जात आहेत. तालुक्यात उसाचे प्रमाण इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. ज्या परिसरात ऊस क्षेत्र आहे तेथील बहुतांश शेतकरी साखर कारखान्याला आपला ऊस पाठवतात. मागील काही वर्षांपासून उसाच्या रसवंत्या सर्वत्र बहरत चालल्या आहेत. यातून रसवंतीचालकांकडून उसाची मोठी मागणी होत आहे. ऊसतोडणीला आल्यावर जागोजागी उसाच्या रसापासून गूळ तयार करणारे गुऱ्हाळ सुरु केले जात होते. गुऱ्हाळाचा आस्वाद घेण्यासाठी शेतकरी आपल्या पाहुण्यांना आमंत्रित करीत असत. गुऱ्हाळाची लगबग पाहावयास मिळत होती. एकीकडे मजुरांची सुरू असलेली ऊसतोडणी, दुसरीकडे चरकातून काढण्यात येणारा उसाचा रस, बाजूलाच पेटवलेली भट्टी, त्यात एकसारखे टाकण्यात येणारे पाचट, भट्टीवर टाकण्यात आलेली भली मोठी लोखंडी कढई, त्यात उसाचा रस आणि गूळ भेंडी ओतून अगदी उकळी फुटेपर्यंत कवच्याने हलवत सततपणे सुरू असलेले काम. उसाच्या रसाच्या आदणाने कढईत उकळी घेतली की समजा गूळ तयार झाला. उसाचे गुऱ्हाळ अहमदपूर तालुक्यातील हाडोळती शिवारात सुरू आहेत.

शेतकऱ्यांना ऊस लागवड केल्यानंतर

एका एकरमध्ये मध्ये २५ आदण निघत असून, एका आदणाला अडीच क्विंटल गूळ निघतो. तर एकरी सहा टन २.५० किलो गूूळ निघतो. गुऱ्हाळ परवडत असतानाही शेतकरी मात्र आपला ऊस कारखान्याला देऊन मोकळे होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

गुऱ्हाळातील गूळ उच्च प्रतिचा...

ऊस तोडणीसह गुऱ्हाळाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत. एकदा गुऱ्हाळ सुरू झाल्यावर ते बंद होऊ नये म्हणून मजुरी व्यतिरिक्त आगाऊ रक्कम मजुरांना द्यावी लागते. गुऱ्हाळात तयार होणारा गूळ शुद्ध आणि उच्च प्रतिचा असतो. त्यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे अशा गुळाला मोठी मागणी आहे. मात्र गुऱ्हाळांची संख्या रोडावल्याने बाजारात प्रक्रिया केलेल्या गुळाची विक्री होताना दिसत नाही.

- विश्वनाथ हेंगणे, शेतकरी