शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

अहमदपूर तालुक्यातील गुऱ्हाळांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:24 IST

अहमदपूर तालुक्यात जलस्रोतांची संख्या वाढली असून, सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे या भागात अधिक पाण्याची पिके घेतली जात ...

अहमदपूर तालुक्यात जलस्रोतांची संख्या वाढली असून, सिंचनाचे क्षेत्रही वाढले आहे. त्यामुळे या भागात अधिक पाण्याची पिके घेतली जात आहेत. तालुक्यात उसाचे प्रमाण इतर पिकांच्या तुलनेत जास्त आहे. ज्या परिसरात ऊस क्षेत्र आहे तेथील बहुतांश शेतकरी साखर कारखान्याला आपला ऊस पाठवतात. मागील काही वर्षांपासून उसाच्या रसवंत्या सर्वत्र बहरत चालल्या आहेत. यातून रसवंतीचालकांकडून उसाची मोठी मागणी होत आहे. ऊसतोडणीला आल्यावर जागोजागी उसाच्या रसापासून गूळ तयार करणारे गुऱ्हाळ सुरु केले जात होते. गुऱ्हाळाचा आस्वाद घेण्यासाठी शेतकरी आपल्या पाहुण्यांना आमंत्रित करीत असत. गुऱ्हाळाची लगबग पाहावयास मिळत होती. एकीकडे मजुरांची सुरू असलेली ऊसतोडणी, दुसरीकडे चरकातून काढण्यात येणारा उसाचा रस, बाजूलाच पेटवलेली भट्टी, त्यात एकसारखे टाकण्यात येणारे पाचट, भट्टीवर टाकण्यात आलेली भली मोठी लोखंडी कढई, त्यात उसाचा रस आणि गूळ भेंडी ओतून अगदी उकळी फुटेपर्यंत कवच्याने हलवत सततपणे सुरू असलेले काम. उसाच्या रसाच्या आदणाने कढईत उकळी घेतली की समजा गूळ तयार झाला. उसाचे गुऱ्हाळ अहमदपूर तालुक्यातील हाडोळती शिवारात सुरू आहेत.

शेतकऱ्यांना ऊस लागवड केल्यानंतर

एका एकरमध्ये मध्ये २५ आदण निघत असून, एका आदणाला अडीच क्विंटल गूळ निघतो. तर एकरी सहा टन २.५० किलो गूूळ निघतो. गुऱ्हाळ परवडत असतानाही शेतकरी मात्र आपला ऊस कारखान्याला देऊन मोकळे होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

गुऱ्हाळातील गूळ उच्च प्रतिचा...

ऊस तोडणीसह गुऱ्हाळाच्या कामासाठी मजूर मिळत नाहीत. एकदा गुऱ्हाळ सुरू झाल्यावर ते बंद होऊ नये म्हणून मजुरी व्यतिरिक्त आगाऊ रक्कम मजुरांना द्यावी लागते. गुऱ्हाळात तयार होणारा गूळ शुद्ध आणि उच्च प्रतिचा असतो. त्यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केलेली नसते. त्यामुळे अशा गुळाला मोठी मागणी आहे. मात्र गुऱ्हाळांची संख्या रोडावल्याने बाजारात प्रक्रिया केलेल्या गुळाची विक्री होताना दिसत नाही.

- विश्वनाथ हेंगणे, शेतकरी