शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

आता वीकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद; कामगार अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनलॉक करण्यात आले होते. व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच राज्य शासनाने नवे निर्बंध ...

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनलॉक करण्यात आले होते. व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच राज्य शासनाने नवे निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. त्यानुसार गर्दी रोखण्यासाठी रविवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ यावेळेत हॉटेल सुरू राहणार असून, शनिवार आणि रविवार या वीकेंडच्या कालावधीत हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. लातूर शहरात जवळपास दीडशेहून अधिक हॉटेल, रेस्टॉरंट आहेत. त्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अडीच हजार आहे. मात्र, नवीन नियमामुळे हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

शहरातील एकूण हॉटेल्स १५०

हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी २,५००

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार

दीड वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे हॉटेल व्यवसाय कोलमडला आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, नव्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. - प्रवीण कस्तुरे, हॉटेल व्यावसायिक

अनलॉक झाल्यानंतर हॉटेल व्यवसाय परिस्थितीत बदल होत होते. मात्र, अचानक दुपारी ४ वाजेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. शनिवार, रविवार केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. या नियमांमुळे हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान होणार आहे. - प्रसाद उदगीरकर, हॉटेल व्यावसायिक.

सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार

हॉटेल व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा म्हणून ओळखला जातो. यावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. अनेकजण कुटुंबासमवेत जेवणासाठी हॉटेलला पसंती देतात.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कधी चालू तर कधी बंद अशा संकटामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे नियोजन कोलमडले आहे.

सकाळी ७ ते ४ यावेळेत हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोजकीच असते. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल

गेल्या दीड वर्षापासून हॉटेल कधी चालू तर कधी बंद आहेत. त्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात येते. त्यामुळे हाताला काम मिळत नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, आता त्यात नवीन नियमामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - शरद मगर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला की, लॉकडाऊन जाहीर केले जाते. मात्र, सर्वसामान्यांना या निर्णयामुळे त्रास सहन करावा लागतो. हॉटेलसाठी निर्बंध लागू करण्यात आल्याने कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न बंद होईल. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आहे. - नेताजी मोतीबोणे