शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आता वीकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद; कामगार अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनलॉक करण्यात आले होते. व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच राज्य शासनाने नवे निर्बंध ...

लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनलॉक करण्यात आले होते. व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच राज्य शासनाने नवे निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. त्यानुसार गर्दी रोखण्यासाठी रविवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ यावेळेत हॉटेल सुरू राहणार असून, शनिवार आणि रविवार या वीकेंडच्या कालावधीत हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. लातूर शहरात जवळपास दीडशेहून अधिक हॉटेल, रेस्टॉरंट आहेत. त्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अडीच हजार आहे. मात्र, नवीन नियमामुळे हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

शहरातील एकूण हॉटेल्स १५०

हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी २,५००

हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार

दीड वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे हॉटेल व्यवसाय कोलमडला आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, नव्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. - प्रवीण कस्तुरे, हॉटेल व्यावसायिक

अनलॉक झाल्यानंतर हॉटेल व्यवसाय परिस्थितीत बदल होत होते. मात्र, अचानक दुपारी ४ वाजेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. शनिवार, रविवार केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. या नियमांमुळे हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान होणार आहे. - प्रसाद उदगीरकर, हॉटेल व्यावसायिक.

सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार

हॉटेल व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा म्हणून ओळखला जातो. यावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. अनेकजण कुटुंबासमवेत जेवणासाठी हॉटेलला पसंती देतात.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कधी चालू तर कधी बंद अशा संकटामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे नियोजन कोलमडले आहे.

सकाळी ७ ते ४ यावेळेत हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोजकीच असते. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल

गेल्या दीड वर्षापासून हॉटेल कधी चालू तर कधी बंद आहेत. त्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात येते. त्यामुळे हाताला काम मिळत नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, आता त्यात नवीन नियमामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - शरद मगर

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला की, लॉकडाऊन जाहीर केले जाते. मात्र, सर्वसामान्यांना या निर्णयामुळे त्रास सहन करावा लागतो. हॉटेलसाठी निर्बंध लागू करण्यात आल्याने कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न बंद होईल. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आहे. - नेताजी मोतीबोणे