शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

आता शेतकरी होणार बाजार समितीचा उमेदवार! अधिसूचना निघाली, लागा तयारीला

By हरी मोकाशे | Updated: March 10, 2023 17:26 IST

राज्य सरकारने अधिसूचना काढली असून १३ मार्चपर्यंत दावे, हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे.

उदगीर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारयादीत, सोसायटी अथवा ग्रामपंचायत मतदारसंघात नाव नसलेल्या शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याची राज्य सरकारने अधिसूचना काढली असून १३ मार्चपर्यंत दावे, हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समिती कार्यक्षेत्रातील १० गुंठे शेती असलेल्या शेतकऱ्यांना आता बाजार समितीसाठी उमेदवार म्हणून रिंगणात उतरता येणार आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका ३० एप्रिलपूर्वी घेण्याबाबत नागपूर खंडपीठाने आदेश दिल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुधारित प्रारूप मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा याद्यांमध्ये समावेश करण्यात आला.

विशेष म्हणजे, बाजार समिती निवडणुकीसाठी सोसायटी अथवा ग्रामपंचायत मतदारसंघातील यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्वी निवडणूक लढविता येत होती. दरम्यान, राज्य सरकारने बाजार समिती निवडणुकीसाठी या यादीत नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात २७ फेब्रुवारी रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून दावे, हरकती मागविण्यात आल्या आहेत.

निवडणूक खर्चही सादर करावा लागणार...बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वी उमेदवारांना निवडणूक खर्च मर्यादा नव्हती. तसेच निवडणूक खर्चही सादर करावा लागत नव्हता. आता राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. निवडणूक झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत खर्च सादर न केल्यास सदरील उमेदवार अपात्र ठरविण्याची तरतूद नवीन कायद्यानुसार करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीElectionनिवडणूक