शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकरी होणार बाजार समितीचा उमेदवार! अधिसूचना निघाली, लागा तयारीला

By हरी मोकाशे | Updated: March 10, 2023 17:26 IST

राज्य सरकारने अधिसूचना काढली असून १३ मार्चपर्यंत दावे, हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे.

उदगीर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारयादीत, सोसायटी अथवा ग्रामपंचायत मतदारसंघात नाव नसलेल्या शेतकऱ्यांना बाजार समिती निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अधिकार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याची राज्य सरकारने अधिसूचना काढली असून १३ मार्चपर्यंत दावे, हरकतीसाठी मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समिती कार्यक्षेत्रातील १० गुंठे शेती असलेल्या शेतकऱ्यांना आता बाजार समितीसाठी उमेदवार म्हणून रिंगणात उतरता येणार आहे.

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका ३० एप्रिलपूर्वी घेण्याबाबत नागपूर खंडपीठाने आदेश दिल्यानंतर निवडणूक प्राधिकरणाने बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सुधारित प्रारूप मतदारयादी अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा याद्यांमध्ये समावेश करण्यात आला.

विशेष म्हणजे, बाजार समिती निवडणुकीसाठी सोसायटी अथवा ग्रामपंचायत मतदारसंघातील यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्वी निवडणूक लढविता येत होती. दरम्यान, राज्य सरकारने बाजार समिती निवडणुकीसाठी या यादीत नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांनाही उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात २७ फेब्रुवारी रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून दावे, हरकती मागविण्यात आल्या आहेत.

निवडणूक खर्चही सादर करावा लागणार...बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पूर्वी उमेदवारांना निवडणूक खर्च मर्यादा नव्हती. तसेच निवडणूक खर्चही सादर करावा लागत नव्हता. आता राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. निवडणूक झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत खर्च सादर न केल्यास सदरील उमेदवार अपात्र ठरविण्याची तरतूद नवीन कायद्यानुसार करण्यात आली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीElectionनिवडणूक