शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

आता टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या नाेकऱ्या धाेक्यात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST

लातूर जिल्ह्यात अनुदानित - ९५९, जिल्हा परिषद - १ हजार २७८ आणि कायम विनाअनुदानित तत्त्वावरील ४४४ अशा एकूण २ ...

लातूर जिल्ह्यात अनुदानित - ९५९, जिल्हा परिषद - १ हजार २७८ आणि कायम विनाअनुदानित तत्त्वावरील ४४४ अशा एकूण २ हजार ७१५ शाळांची संख्या आहे. यामध्ये जिल्हा परिषद शाळामध्ये ५ हजार ८८१ शिक्षक, खासगी अनुदानित शाळांमध्ये १० हजार ९५३ आणि विनाअनुदानित शाळामध्ये ३ हजार ८०० असे एकूण २० हजार ७७७ शिक्षक कार्यरत आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणीअंती निकाल आला आहे. यामध्ये टीईटी उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांनाच आता शिक्षक म्हणून सेवेत कायम राहता येणार आहे. परिणामी, लातूर जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या नाेकरीवर गंडांतर आले आहे.

माहिती संकलन सुुरू...

टीईटी संदर्भाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निकालानंतर आता लातूर जिल्ह्यातील टीईटी उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण शिक्षकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. माहिती हाती आल्यानंतर किती शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाहीत, ही आकडेवारी उपलब्ध हाेणार आहे. लातूर जिल्ह्यात एकूण २ हजार ७१५ शाळात तब्बल २० हजार ७७७ शिक्षक कार्यरत आहेत.

- विशाल दशवंत, प्रभारी शिक्षणाधिकारी, लातूर

राज्यातील शिक्षक संघटनांचा विराेध

ज्या शिक्षकांची सेवा दहा ते पंधरा वर्षापेक्षा अधिक झाली आहे. अशा शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण नाही म्हणून सेवेतून कमी करणे, हे त्या शिक्षकांवर अन्यायकारक आहे. टीईटी परीक्षा अस्तित्वात आल्यानंतर भविष्यात निवड हाेणाऱ्या शिक्षकांसाठी टीईटी उत्तीर्ण अनिवार्य करावे, जे सेवेत आहेत़ त्यांना आता कायम करावे, अशी आमची मागणी आहे.

- शरद हुडगे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना

टीईटी उत्तीर्णबाबत आलेला निकाल २०१० पूर्वी सेवेत दाखल झालेल्या शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. टीईटी २०१० पासून अनिवार्य करण्यात आली आहे. तर २०१० नंतर सेवेत येणाऱ्या शिक्षकांना ती अनिवार्य करण्याबाबत आमचा विराेध नाही. मात्र, सरसकट सर्वच शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण अनिवार्य करणे चुकीचे, अन्यायकारक ठरणार आहे. २०१० पूर्वी सेवतील शिक्षकांना यातून सवलत देण्यात यावी.

- लायक पटेल, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

टीईटी बाबत देण्यात आलेला निर्णय शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. सेवेत असलेल्या शिक्षकांना पुन्हा संधी देण्याची गरज आहे़ त्यांना पात्र ठरविण्याबाबत निर्णय शासनाने घेतला पाहिजे. तरच शिक्षकांवर हाेणारा अन्याय दूर हाेणार आहे. खंडपीठाने दिलेल्या निर्णयाचा फटका हजाराे शिक्षकांना प्रत्यक्ष बसणार आहे. यातून मार्ग काढून शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे.

- अप्पाराव शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ