शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पुनर्नियुक्ती आदेश मिळेनात, वेतनही रखडले; लातूर जिल्हा परिषदेतील कंत्राटींचा जीव टांगणीला!

By हरी मोकाशे | Updated: July 10, 2023 17:28 IST

हे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने जवळपास २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती आदेश दिले जातात.

लातूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियानअंतर्गत जवळपास १९६ कंत्राटी कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा कालावधी मे अखेरीस संपुष्टात आला आहे. त्यामुळे त्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्नियुक्ती आदेश मिळणे अपेक्षित होते. मात्र, सव्वामहिना उलटला तरी अद्यापही हे आदेश मिळाले नाहीत. या कर्मचाऱ्यांना धास्ती लागली आहे. विशेष म्हणजे, वेतनही थकित राहिले आहे.

शासनाच्या वतीने समग्र शिक्षा अभियान राबविण्यात येते. या अभियानाअंतर्गत कर्मचाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात येते. हे कर्मचारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत आहेत. प्राथमिक शिक्षण विभाग आणि शाळा यांच्यामधील दुवा म्हणून हे कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांना शाळापूर्व तयारी बैठक, विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट करुन घेऊन ते ऑनलाईनरित्या सादर करण्यासाठी पाठपुरावा करणे, शिक्षण परिषद, शाळा भेटी, पाठ्यपुस्तक वितरण, गणवेश वाटप निधी वितरित करणे, हंगामी वस्तीगृहासाठी सर्वे यासह अन्य काही शैक्षणिक सर्वे करावे लागतात.

दरम्यान, हे कर्मचारी कंत्राटी पध्दतीने जवळपास २७ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना दर सहा महिन्यांनी एक दिवसाचा खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती आदेश दिले जातात. मात्र, यंदा प्रथमच सव्वा महिना उलटला तरी अद्यापही पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नाहीत.

१९६ कंत्राटी कर्मचारी धास्तावले...समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत कंत्राटी पध्दतीने अभियंता, संगणक प्रोगामर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एमआयएस कॉडिनेटर, साधन व्यक्ती, विशेष शिक्षक असे एकूण १९६ जण आहेत. विशेष म्हणजे, हे कर्मचारी सन १९९५ पासून सुरु झालेल्या डीपीईपीपासून कार्यरत आहेत. सन २००१ मध्ये त्याचे सर्व शिक्षा अभियान असे रुपांतर झाले. त्यानंतर सन २०२१ मध्ये सग्रम शिक्षा असा बदल झाला आहे.

सहा महिन्यांनंतर एक दिवसाचा खंड...या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दर सहा महिने झाले की, एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन जिल्हा परिषदेकडून पुनर्नियुक्ती देण्यात येते. दरम्यान, या कर्मचाऱ्यांचा नियुक्तीचा कालावधी ३० मे रोजी संपुष्टात आला आहे. मात्र, त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पुनर्नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही ती मिळाली नाही.

नेहमीप्रमाणे कामावर रुजू...सहा महिने झाले की पुनर्नियुक्ती देण्यात येते, हे जवळपास २५ वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे एक दिवसाचा खंड घेऊन पुन्हा आम्ही कामावर कार्यरत होतो. त्यानुसार आताही रुजू झालो. मात्र, महिना उलटला तरी पुनर्नियुक्ती आदेश मिळाले नाहीत. त्यामुळे एक महिन्याचे वेतन थकित राहिले आहे, असे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मी चार दिवसांपूर्वी रुजू...बदली झाल्याने मी चार दिवसांपूर्वी रुजू झालो आहे. त्यामुळे या विषयासंदर्भात मला माहिती नाही. तसेच हा विषय माझ्याकडे येत नाही.- प्रमोद पवार, उपशिक्षणाधिकारी.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद