शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
4
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
5
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
6
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
7
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
8
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
9
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
10
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
12
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
13
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
14
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
15
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
16
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
17
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
18
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

पाणी नाही पिण्याला, अन् ग्रामपंचायत कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:24 IST

नागरी सुविधा मिळत नाहीत. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे म्हणत समस्या मांडण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. ...

नागरी सुविधा मिळत नाहीत. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, असे म्हणत समस्या मांडण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. मात्र, तिथे सरपंच, उपसरपंच अथवा ग्रामविकास अधिकारी नसल्याने पाणी नाही पिण्याला अन् ग्रामपंचायत कशाला, असा सवाल व्यक्त केला.

चाकूर तालुक्यातील चापोली ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गतच्या शंकरवाडी येथे पिण्याच्या पाण्यासाठी नळयोजना नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी १२ महिने भटकंती करावी लागते. सध्या उन्हाळ्यात तर पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी नाल्या नाहीत. विद्युत पथदिवे नाहीत यासह अन्य मूलभूत समस्या आहेत. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. घरकुल व विहीर योजनेसाठी दुर्लक्ष केले जाते. गावामध्ये स्वच्छता नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. गटारी तुंबल्या आहेत. साफसफाई करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून दक्षता घेतली जात नाही.

सध्या येथे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात नाही. येथील नागरी समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप केला. ग्रामपंचायतीने नागरी सुविधा व अडचणी न सोडविल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला. यावेळी प्रशासनास निवेदन देण्यात आले. त्यावर महानंदा कासले, छाया पस्तापुरे, कांताबाई कांबळे, पार्वती चिमले, लक्ष्मीबाई कांबळे, सखुबाई चिमले, वंदना रामासाने, सुमन चिमले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

लवकर समस्या सोडविल्या जातील...

शंकरवाडी येथील महिलांनी पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह अन्य नागरी सुविधांबाबत निवेदन दिले आहेत. लवकर त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह अन्य अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ग्रामविकास अधिकारी हणमंत मुरुडकर यांनी सांगितले.