शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

चॉकलेट नको, मला सॅनिटायझर हवे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:17 IST

लातूर : शाळा-महाविद्यालयांमध्ये आता विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. गेल्या दहा-बारा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर ...

लातूर : शाळा-महाविद्यालयांमध्ये आता विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. गेल्या दहा-बारा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शाळा सुरू झाल्या आहेत. उपस्थित विद्यार्थी संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. जनजागृतीमुळे विद्यार्थी शाळेत जाताना चॉकलेट नको मला सॅनिटायझर, मास्क हवे असा हट्ट करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये आता सॅनिटायझरची बाटली दिसत आहे.

जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या १ हजार ९३७ शाळा आहेत. त्यापैकी १ हजार ७२५ शाळा सुरू झाले आहेत. या शाळांच्या पटावर २ लाख १० हजार २०० विद्यार्थ्यांची नोंद आहे. त्यापैकी ७६ हजार ५३० च्या आसपास विद्यार्थी दररोज उपस्थित राहत आहेत. ऑफलाइन किंवा ऑनलाइन हे विद्यार्थ्यांच्या मनावर असल्याने त्यांना पसंतीनुसार ऑफलाइन, ऑनलाइन वर्ग करता येत आहेत. दिवसेंदिवस ऑफलाइन वर्गाला विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. वीस ते पंचवीस टक्क्यांवरील उपस्थिती चाळीस ते पन्नास टक्क्यांवर पोहोचली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता सॅनिटायझर आणि मास्क वापर चांगला असल्याचे दिसून आले. शाळेत येताना पालकांकडे सॅनिटायझरचा हट्ट विद्यार्थी करीत आहेत. शाळेतील शिक्षकांकडून सुरक्षित अंतर, सॅनिटायझर आणि मास्क वापरणे याबाबत जनजागृती केल्याने विद्यार्थी घरी आल्यावरही आपल्या पालकांना सदर माहिती देत आहेत.