शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

निलंग्यात उन्हाळी सोयाबीनचे नवे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:18 IST

निलंगा : गत पावसाळ्यात अतिपाऊस तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आगामी खरीप हंगामात सोयाबीन ...

निलंगा : गत पावसाळ्यात अतिपाऊस तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. दरम्यान, कृषी विभाग बिजोत्पादनासाठी उन्हाळी सोयाबीनचे प्रात्यक्षिक घेत असून, सध्या तीन एकरावरील हे सोयाबीन बहरले आहे. त्यामुळे शेतक-यांत कुतूहल निर्माण झाले आहे.

आगामी खरीप हंगामात बिजोत्पादनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गवसाने, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, मंडल कृषी अधिकारी रणजित राठोड व कृषी सहायक सुनील घारूळे यांनी उन्हाळी सोयाबीन लागवडीसाठी प्रोत्साहन देऊन नवीन प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळेच तालुक्यातील नणंद येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप कुलकर्णी यांनी ३ एकरात उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे.

उन्हाळी सोयाबीनची पेरणी साधारणतः डिसेंबरअखेरीस ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात केली जाते.

नणंद येथील प्रदीप कुलकर्णी यांनी उन्हाळी सोयाबीनची लागवड करून योग्य नियोजन केल्यामुळे सध्या हे पीक चांगले बहरले असून, फुलधारणेच्या अवस्थेत आहे. त्यामुळे कुतूहलाचा विषय ठरला आहे. हे सोयाबीन पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी येत आहेत. एप्रिलमधील वाढत्या तापमानात सोयाबीनचे किती उत्पन्न पदरी पडते, याची प्रतीक्षा असल्याचे शेतकरी प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

तालुक्यात प्रथमच प्रयोग...

निलंगा तालुक्यात २० वर्षांपूर्वी ३०० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होत होता. त्यानंतर मुख्य पिकाशी स्पर्धा करीत आता सोयाबीनचे क्षेत्र ६९ हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. शेतक-यांना दरवर्षी लागणाऱ्या बियाणांपैकी ४० टक्के बियाणे शेतकरी बाजारातून खरेदी करतात. खरेदीचे प्रमाण कमी करून शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे म्हणून उन्हाळी सोयाबीन लागवडीचे प्रयोग मंडल कृषी अधिकारी रणजित राठोड हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक कृषी सहाय्यकांच्या कार्यक्षेत्रात प्रथमच घेत आहेत. त्यातून तालुक्यात किमान ३०० क्विंटल बियाणे मिळणार आहे. यातील अडचणींचा अभ्यास केला जाईल. या नव्या प्रात्यक्षिकामुळे आगामी काळात शेतकरी किमान बीजोत्पादनासाठी तरी उन्हाळी सोयाबीन घेतील.

- रणजित राठोड, मंडल कृषी अधिकारी.

तालुक्यात ५४ एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन पेरा झाला आहे. त्यातून शेतकऱ्यांना बियाणे बदल व बीजोत्पादनाकरिता उन्हाळी लागवडीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. बाजारातील बियाणांवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार आहे. घरचे दर्जेदार बियाणे तयार करून ते पुढील हंगामासाठी वापरण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.

- राजेंद्र काळे, तालुका कृषी अधिकारी.