शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपुढे नवे संकट; हरभऱ्यावर मर रोगाचा अन् ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

By हरी मोकाशे | Updated: December 20, 2023 17:30 IST

वातावरणातील बदलाचा पिकांवर परिणाम

लातूर : गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले असले तरी रबी हंगामातील पिकांचा वाढला आहे. सध्या हरभरा वाढीच्या अवस्थेत असून वातावरणातील बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच काही ठिकाणच्या ज्वारीवर लष्करी अळी दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले असून रोगाच्या नियंत्रणासाठी विविध औषधांची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

गत आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. हवेत गारवा वाढल्याने थंडी अधिक जाणवत आहे. वातावरणातील बदलाचा रबी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी- नाले वाहिले नाहीत. त्याचबरोबर मध्यम व लघु प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. परिणामी, यंदाच्या हंगामात रबीचा पेरा घटेल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर रबीचा पेरा झाला आहे. जवळपास ११८ टक्के पेरणी झाली आहे.

पावणेतीन लाख हेक्टरवर हरभरा...जिल्ह्यात हरभऱ्याचा पेरा २ लाख ७१ हजार ४६२ हेक्टरवर झाला असून सध्या पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पीक फुलोऱ्यात आहे. दरम्यान, काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी पक्षीथांबे प्रति हेक्टर ५० उभारावेत. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेडेझिम ५० डब्ल्यू पी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत...जिल्ह्यात ३२ हजार ५५७ हेक्टरवर रबी ज्वारीचा पेरा झाला आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची अथवा ॲझाडिरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. मेटा- हायझीयम ॲनिसोप्ली ५० ग्रॅम अथवा नोमुरिया रिलाई ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

तुरीवर शेंगा पोखरणारी अळी...सध्या तूरीच्या शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. तसेच काही ठिकाणी काढणीही सुरु झाली आहे. दरम्यान, काही ठिकाणी शेंगा पोखणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली अथवा एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची ५ मिली अथवा फ्ल्यूबॅडामाईड ३९.३५ एससी २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, अशी माहिती कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी शिवाजी तांदळे यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर