शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

शेतकऱ्यांपुढे नवे संकट; हरभऱ्यावर मर रोगाचा अन् ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव

By हरी मोकाशे | Updated: December 20, 2023 17:30 IST

वातावरणातील बदलाचा पिकांवर परिणाम

लातूर : गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले असले तरी रबी हंगामातील पिकांचा वाढला आहे. सध्या हरभरा वाढीच्या अवस्थेत असून वातावरणातील बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच काही ठिकाणच्या ज्वारीवर लष्करी अळी दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले असून रोगाच्या नियंत्रणासाठी विविध औषधांची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

गत आठवड्यापासून वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. हवेत गारवा वाढल्याने थंडी अधिक जाणवत आहे. वातावरणातील बदलाचा रबी हंगामातील पिकांवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील नदी- नाले वाहिले नाहीत. त्याचबरोबर मध्यम व लघु प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. परिणामी, यंदाच्या हंगामात रबीचा पेरा घटेल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र, आतापर्यंत ३ लाख ३१ हजार ६३० हेक्टरवर रबीचा पेरा झाला आहे. जवळपास ११८ टक्के पेरणी झाली आहे.

पावणेतीन लाख हेक्टरवर हरभरा...जिल्ह्यात हरभऱ्याचा पेरा २ लाख ७१ हजार ४६२ हेक्टरवर झाला असून सध्या पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पीक फुलोऱ्यात आहे. दरम्यान, काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी पक्षीथांबे प्रति हेक्टर ५० उभारावेत. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. मर रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेडेझिम ५० डब्ल्यू पी १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ज्वारीचे पीक वाढीच्या अवस्थेत...जिल्ह्यात ३२ हजार ५५७ हेक्टरवर रबी ज्वारीचा पेरा झाला आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची अथवा ॲझाडिरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. मेटा- हायझीयम ॲनिसोप्ली ५० ग्रॅम अथवा नोमुरिया रिलाई ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

तुरीवर शेंगा पोखरणारी अळी...सध्या तूरीच्या शेंगा परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. तसेच काही ठिकाणी काढणीही सुरु झाली आहे. दरम्यान, काही ठिकाणी शेंगा पोखणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासाठी ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली अथवा एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची ५ मिली अथवा फ्ल्यूबॅडामाईड ३९.३५ एससी २ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे, अशी माहिती कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी शिवाजी तांदळे यांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर