शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत पुरवठ्याअभावी आरोग्य केंद्राची नवीन इमारत धूळखात पडून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

किनगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी पाच एकर परिसरामध्ये बांधण्यात आले होते. इमारतीला जागोजागी तडे गेले ...

किनगाव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्र साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी पाच एकर परिसरामध्ये बांधण्यात आले होते. इमारतीला जागोजागी तडे गेले आहेत व कर्मचारी वसाहतीची दुरवस्था झाली असून, छताचा गिलावा गळून पडून कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तीन कोटी रुपये खर्च करून नवीन इमारत बांधण्यात आली आहे; परंतु केवळ विद्युत पुरवठ्याअभावी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धूळखात पडून आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.

किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दररोज २०० ते २५० बाह्यरुग्ण तपासणी केली जाते. या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लातूर जिल्ह्यासह परभणी, बीड जिल्ह्यातील लोक उपचारासाठी येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ५० वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून, ती सद्य:स्थितीत जीर्ण झाली आहे. तसेच कर्मचाऱ्यांसाठी सात निवासस्थाने व अधिकाऱ्यांसाठी दोन निवासस्थाने बांधण्यात आली आहेत; पण तेही जीर्ण झाले असून जागोजागी इमारतीला तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी छताचा गिलावा पडून जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून वसाहतीमध्ये राहावे लागत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्ष जिल्हा परिषदेच्या वतीने किनगाव येथे २ कोटी ९० लाख रुपये खर्च करून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत बांधण्यात आली आहे. या नवीन आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी कक्ष २, ऑपरेशन कक्ष एक, लॅब कक्ष, लसीकरण कक्ष, अपघात विभाग, परिचारिका कक्ष, औषध निर्माता कक्ष, आस्थापना, पुरुष वाॅर्ड व महिला वाॅर्ड, असे बारा कक्ष बांधण्यात आले आहेत. नवीन इमारतीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली नाहीत. या नवीन इमारतीच्या विद्युतीकरणासाठी २४ लाख ९५ हजार रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे; परंतु संबंधित गुत्तेदार याने सिंगल फेजचे कनेक्शन नवीन इमारतीला दिल्यामुळे सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नवीन इमारतीचा प्रवेश रखडला आहे.

थ्री फेज विद्युत पुरवठा करणे गरजेचे...

नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये थ्री फेज विद्युत पुरवठा करणे गरजेचे आहे. तसा शासन नियम आहे; पण संबंधित ठेकेदाराने सिंगल फेज विद्युत पुरवठ्याचे विद्युत मीटर त्याठिकाणी बसवल्याने विद्युत पुरवठ्यामध्ये सातत्याने व्यत्यय येत असून, विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तत्काळ थ्री फेज विद्युत पुरवठा सुरू केल्यास रुग्णांची गैरसोय होणार नाही व नवीन इमारत वापरात येईल.

- डॉ. प्रमोद सांगवीकर,

वैद्यकीय अधिकारी