शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

दोन वर्षांपासून राष्ट्रीय बायोगॅसचे अनुदानच 'गॅस'वर; कृषी विभागाकडे लाभार्थ्यांचे हेलपाटे

By हरी मोकाशे | Updated: January 20, 2024 18:08 IST

याेजनेअंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारल्यास १२ हजारांचे अनुदान देण्यात येते.

लातूर : पर्यावरणाचे संतुलन राखण्याबरोबरच शेतीसाठी सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे. शिवाय, ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन योजना राबविण्यात येत आहे. दरम्यान, दुसरे वर्ष उलटत आले तरी अद्यापही गेल्या वर्षीच्या १२५ लाभार्थ्यांचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे या लाभार्थी शेतकऱ्यांकडून वारंवार चौकशी करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांमध्ये स्वयंपाकासाठी लाकडाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वृक्षतोड वाढली आहे. परिणामी, हवेचे प्रदूषण वाढत आहे. त्याचबरोबर काही घरांमध्ये इंधन म्हणून केरोसीनचा वापर करण्यात येतो. तो बंद व्हावा आणि पर्यावरणाचे संतुलन कायम रहावे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून अनुदानावर नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याेजनेअंतर्गत बायोगॅस सयंत्र उभारल्यास १२ हजारांचे अनुदान देण्यात येते.

कृषी विभागाकडे लाभार्थ्यांचे हेलपाटे...नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सन २०२२-२३ या वर्षात एकूण १२५ बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट होते. कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन सातत्याने प्रयत्न करीत उद्दिष्ट गाठले. मात्र, लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे लाभार्थ्यांकडून वारंवार कृषी विभागाकडे चौकशी करण्यात येत आहे.

लातूर, औश्यात सर्वाधिक सयंत्र...तालुका - सयंत्रलातूर - १७औसा - १७निलंगा - १५रेणापूर - ९शिरुर अनं. - ९उदगीर - १६अहमदपूर - १६चाकूर - १०देवणी - ८जळकोट - ८एकूण - १२५

बायोगॅस सयंत्र उभारणीकडे ओढा...बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी केंद्र सरकारकडून सर्वसाधारण लाभार्थ्यास १२ हजार रुपये तर अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना १३ हजार रुपये अनुदान देण्यात येते. याशिवाय, शौचालय जोडणी केल्यास जिल्हा परिषदेच्या सेसमधून लाभार्थ्यास मदत दिली जाते. दरम्यान, बायोगॅस सयंत्र उभारावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे दरवर्षी लाभार्थी संख्या वाढत आहे.

पाच वर्षांत ५०० सयंत्र उभारणी...वर्ष - एकूण सयंत्र२०१८-१९ : ११९२०१९- २० : ९८२०२०- २१ : ३८२०२१-२२ : १२०२०२२- २३ : १२५

सेंद्रीय खत निर्मितीस प्राधान्य...अधिकाधिक शेती उत्पादन घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा वापर वाढला आहे. मात्र, त्याचे दुष्परिणाम शेतीवर होत आहेत. हे कमी व्हावे आणि सेंद्रीय खत वापरास चालना मिळावी अशाही हेतूने केंद्र शासनाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शासनाकडे पाठपुरावा...नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी १२५ सयंत्र उभारण्यात आले आहे. शासनाकडून अद्यापही अनुदान उपलब्ध झाले नाही. त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. लवकरच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीlaturलातूर