शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग चालतात. शाळेचे मुख्याध्यापक यू.एस. कांबळे यांनी कुणाचीच परवानगी न घेता एक नव्हे दोन नव्हे तब्बल नऊ झाडे परस्पर विक्री केली आहेत. झाडे तुटल्याची माहिती तहसीलदारांना मिळताच त्यांनी वनविभागाला कळवले. वनपाल गोविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक मीरा बौबले, वनसेवक बाळू ओव्हळ, धोंडापुरे, अमोल सूर्यवंशी, दता कराड पंचनाम्यासाठी गेले असता तेथे फक्त ओला पालापाचोळा, काटक्या आढळून आल्या. झाडे तोडताना वनविभागाची परवानगी घेणे गरजेचे असते. आम्ही शाळेत गेलो होतो, मात्र तेथे कुणीच कर्मचारी नव्हते, असे वनपाल गोविंद माळी यांनी सांगितले.
झाडे वाळलेली होती : मुख्याध्यापक
सर्व झाडे वाळलेली होती, कुणाच्या तरी अंगावर पडून व शेजारच्याच्या पत्र्यावर कचरा पडत होता. त्याचीही तक्रार होती म्हणून झाडे तोडली व त्या पैशातून शाळेच्या मोडलेल्या खिडक्या, दारे दुरुस्ती करून घेणार आहे, असे मुख्याध्यापक यू.एस. कांबळे यांनी सांगितले.