शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शाळकरी मुलाचा खून; अल्पवयीन मुलासह आई-वडिलांविराेधात गुन्हा, एक ताब्यात : विळ्याने वार करून संपविले

By राजकुमार जोंधळे | Updated: January 13, 2025 21:56 IST

दाेन अल्पवयीन मुलांनी त्यांचाच मित्र असलेल्या १७ वर्षीय रितेश वीरेंद्र गिरी याचा कमालपूर (ता. औसा) शिवारात विळ्याने वार करून खून केला.

राजकुमार जाेंधळे / लातूर : दाेन अल्पवयीन मुलांनी त्यांचाच मित्र असलेल्या १७ वर्षीय रितेश वीरेंद्र गिरी याचा कमालपूर (ता. औसा) शिवारात विळ्याने वार करून खून केला. याप्रकरणी भादा पाेलिस ठाण्यात दाेन अल्पवयीन मुलांसह एकाचे आई-वडील तर अन्य एकाच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मयत रितेशचे वडील वीरेंद्र पाेपट गिरी (वय ३८, रा. कमालपूर, ता. औसा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, मुलगा रितेश यास ११ जानेवारी राेजी सायंकाळी ६ वाजता त्याच्या दाेन मित्रांनी घराबाहेर बाेलावले हाेते. रात्री ९ वाजले तरी रितेश घराकडे आला नाही. त्यामुळे साेबतच्या मित्रांकडे कुटुंबीयांनी विचारणा केली असता, ताे तेव्हाच निघून गेला असे उत्तर मिळाले. त्यानंतर १२ जानेवारी राेजी पहाटेपासून रितेशच्या कुटुंबीयांनी पुन्हा शाेध सुरू केला. रितेशसाेबत गेलेल्या मित्रापैकी एकाला पुन्हा विचारणा केली. त्यावेळी उडवाडवीची उत्तरे मिळाली. विश्वासात घेतल्यानंतर त्याने गावातील नारळ बागेतील नारळ खाण्यासाठी विळा घेऊन आम्ही गेलाे हाेताे, असे सांगितले. तेथे नारळे खाली काढून आम्ही खाल्ली. परत येताना वाटेत गुन्ह्यात सामील अल्पवयीन मुलगा आणि रितेश यांच्यात वाद झाला. हातात असलेल्या विळ्याने गळ्यावर, डाेक्यात आणि पाेटावर वार करून ठार केले. त्यानंतर वाटेतील त्याच शेतात साेयाबीनच्या गुळीमध्ये टाकून त्यावर गुळी टाकली. ही माहिती मिळाल्यानंतर मयत रितेशच्या आई-वडिलांनी शेतात जाऊन पाहिले असता, विवस्त्र अवस्थेत गुळीच्या मध्ये मृतदेह आढळला. 

रितेशला ज्या दाेन मुलांनी संगनमताने मारले त्यांच्यापैकी एकाचे आई-वडील आणि दुसऱ्याचे वडील यांनीही मृतदेहावर गुळी टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आराेप फिर्यादीत नमूद आहे. त्याबाबत अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांवर रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.