शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

मुखेड तालुक्यातील वाहनचालकाच्या खुनाचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:25 IST

पाेलिसांनी सांगितले, बालाजी शेषेराव बनसाेडे (वय ३५) हे पीकअप वाहन चालवून आपला उदरनिर्वाह चालवित होते. ते सध्या उदगीर शहरात ...

पाेलिसांनी सांगितले, बालाजी शेषेराव बनसाेडे (वय ३५) हे पीकअप वाहन चालवून आपला उदरनिर्वाह चालवित होते. ते सध्या उदगीर शहरात वास्तव्याला हाेते. १६ जूनराेजी दुपारी निलंगा येथे भाडे घेऊन गेले हाेते. सायंकाळच्यासुमारास उदगीरकडे येत असताना वालांडी शिवारात त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला हाेता. वलांडीपर्यंत आहे, तासाभरात घरी येताे, असे कुटुंबीयांना बालाजी बनसाेडे यांनी आपल्या माेबाईलवरून सांगितले हाेते. मात्र, त्यानंतर त्यांचा आणि कुटुंबीयांचा संकर्प तुटला. रात्रभर ते घरी परतलेच नाहीत. कुटुंबीयांना घातपाताचा संशय आल्याने त्यांनी शाेधाशाेध केली असता, वालांडी शिवारात सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी देवणी पाेलीस ठाण्यात प्रारंभी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. अज्ञातांनी त्यांचा खून करून वाहनही पळविले हाेते. याबाबत पाेलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. तीन आठवड्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे हेळंब येथील विकास रघुनाथ सूर्यवंशी (वय २९) आणि ज्ञानेश्वर भारत बाेरसुरे (२१) या दाेघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. पाेलिसी खाक्या दाखवताच दाेघांनीही खून केल्याची कबुली दिली.

हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक गजनान भातलवंडे, पाेलीस निरीक्षक कामठेवाड, सपाेनि. सुधीर सूर्यवंशी, पाेउपनि. संजय भाेसले, सपाेउपनि. खान, राजेंद्र टेकाळे, रामहरी भाेसले, राहुल साेनकांबळे, सदानंद याेगी, याेगेश गायकवाड, सिचन धारेकर, चालक जाधव यांच्या पथकाने केला.

समाेर येऊन वाहन अडविले...

आरोपी विकास आणि ज्ञानेश्वर हे देवणी तालुक्यातील हेळंब पाटी येथे सायंकाळच्यासुमारास थांबले हाेते. उदगीरकडे जायचे आहे, म्हणून त्यांनी रस्त्यावर आडवे येत चालक बालाजी बनसाेडे यांचे वाहन अडविले. याच कारणावरून त्यांच्यात आणि चालक बालाजी बनसाेडे यांच्यात वाद झाला. यातूनच आम्ही डाेक्यात दगड घालून चालकाला गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मग उचलून वलांडी शिवारातील शेताच्या बांधालगत टाकून दिले. त्यानंतर माेबाईल, ओळखपत्र, पैशाचे पाकीट व वाहन घेऊन फरार झालाे, अशी कबुली आराेपींनी दिली आहे. दरम्यान, या खुनाच्या घटनेला अखेर वाचा फुटल्याने दाेघांच्या मुसक्या आवळण्यात पाेलिसांना यश आले.