शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
4
काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
5
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
लक्ष्मी नारायण विपरीत राजयोग: ‘या’ राशी ठरतील लकी, मनासारखे घडेल; सुबत्ता-कल्याण-मंगळ काळ!
7
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
8
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
9
गांधी कुटुंब एकत्र भेटते, तेव्हा काय गप्पा रंगतात? प्रियंकांचा मुलगा रेहान वाड्रा म्हणतो...
10
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
11
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
12
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
13
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
14
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
15
Tiger Attack: वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
16
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
17
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
18
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
19
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
20
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
Daily Top 2Weekly Top 5

वाढवणा मंडलात सर्वाधिक पाऊस, बळीराजाला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST

उदगीर : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी शहर व तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे कोमेजून जाणाऱ्या खरीप ...

उदगीर : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी शहर व तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे कोमेजून जाणाऱ्या खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आणखीन मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, वाढवणा मंडलात सर्वाधिक पाऊस झाला असून, तालुक्यात आतापर्यंत सरासरी ३५२ मिमी पाऊस झाला आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मृग नक्षत्रात पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आणि खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली. साधारणपणे २० जूनपर्यंत तालुक्‍यातील सर्वच भागांत पेरण्या आटोपल्या होत्या. पिकेही चांगली उगवल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत होते. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कडक ऊन पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.

दरम्यान, २ जुलै व ८ जुलै रोजी तालुक्यातील सर्वच मंडलांत थोडाफार पिकांपुरता पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना धीर आला होता. त्यानंतर पुन्हा रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. वाढवणा मंडलात सर्वात जास्त तर मोघा मंडलात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात झाली आहे. या पावसामुळे कोवळी पिके आता धोक्याबाहेर येण्यास मदत होणार आहे. तसेच ज्यांच्या पेरण्या जूनच्या पहिल्या आठवड्यात झाल्या आहेत, असे शेतकरी आता फवारणीच्या तयारीला लागले आहेत.

या पावसामुळे तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसह तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या पिकांपुरता पाऊस झाला असला तरी आगामी काळात आणखी मोठ्या पावसाची शेतकरी आशा करत आहेत.

आतापर्यंत तोंडार मंडलात कमी पाऊस...

तालुक्यात रविवारी झालेल्या पावसाची नोंद मिमीमध्ये पुढीलप्रमाणे असून, कंसातील संख्या आतापर्यंतच्या पावसाची : उदगीर १४ (४३५), नागलगाव २५ (३४०), मोघा ७ (३९१), हेर २९ (२७२), वाढवणा ६९ (३५५), नळगीर ३१ (४५३), देवर्जन २३ (३१५), तोंडार ३२ (२५८) मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण सरासरी ३५२ मिमी पाऊस झाला आहे.

शेतकऱ्यांतून समाधान...

मध्यंतरीच्या काळात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे महागामोलाचे बी-बियाणे, खते निष्फळ जाणार की काय, अशी भीती होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.