शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले; आठवडी बाजार, गर्दीत चोरटे सक्रिय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST

५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही लातूर जिल्ह्यात प्रवासादरम्यान, भाजी मंडई, प्रमुख बाजारपेठ आणि आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे ...

५० टक्के मोबाईलचा तपास लागतच नाही

लातूर जिल्ह्यात प्रवासादरम्यान, भाजी मंडई, प्रमुख बाजारपेठ आणि आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे मोबाईल चोरट्यांकडून पळविले जातात. यांतील जवळपास मोबाईलचा शोध लागत नसल्याचा तक्रारदारांना अनुभव आहे. तक्रार केल्यानंतर महिना, दोन महिन्यांनंतर नागरिकही पाठपुरावा करीत नाहीत. केला तरी ते हतबल ठरतात.

मोबाईल चोरणाऱ्या स्वतंत्र टोळ्या

शहरातील गर्दीच्या ठिकाणी, प्रमुख बाजारपेठ आणि ग्रामीण भागात भरणाऱ्या आठवडी बाजारात मोबाईल चोरणाऱ्या स्वतंत्र टोळ्या सक्रिय आहेत. यामध्ये काही अल्पवयीन गुन्हेगारांचाही समावेश आहे. ज्या भागात आठवडी बाजार आहे, त्या भागातील ठाण्यांत मोबाईल चोरीच्या तक्रारी दाखल होतात. गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या खिशातील मोबाईल लंपास केला जातो. काही कळण्याच्या आतच हे चोरटे पसार होतात.

मोबाईल चोरीस जाताच तातडीने हे करा

एखाद्या नागरिकाचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्याने तातडीने संबंधित पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करावी. प्रारंभी सिमकार्ड बंद करून टाकावे. मोबाईलमधील सर्व प्रकारचे पासवर्ड बदलून टाकावे. ऑनलाईन बँकिंग असल्यास तातडीने बँकेला माहिती देऊन व्यवहार बंद करावा. यातून चोरीला गेलेल्या मोबाईलचा गैरफायदा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

सायबर सेलकडून चोरीचा तपास

मोबाईल चोरीच्या तक्रारी ठाणे स्तरावर दाखल होतात. तेथून सायबर सेलकडे माहिती पुरविली जाते. मोबाईल चोरी प्रकरणाचा तपास सायबर सेलकडूनही केला जातो. चोरीतील मोबाईल कोणी वापरत असेल तर लोकेशन तपासले जाते. त्या अनुषंगाने आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी सायबरची मदत होते.

- निखिल पिंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर.

हेल्पलाईनची मदत घ्या

मोबाईल फोन हरविल्यानंतर किंवा चोरीला गेला तर तातडीने हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर तुमची तक्रार नोंदविण्यात येते. त्याचबरोबर मोबाईलचे नेटवर्क बंद होते. आयएमईआय क्रमांकावरून ऑपरेटर्स नेटवर्क ब्लॉक करू शकतील. ज्यातून मोबाईलचा गैरवापर होणार नाही.

लातूर जिल्ह्यात यापूर्वी आयएमईआय क्रमांक बदलण्याचे प्रकारही घडले आहेत. या प्रकरणी यापूर्वी लातुरातून पोलिसांनी काहीजणांना अटक केली होती. चोरीतील मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी असे प्रकार केले जातात. त्यातून तपासामध्ये अडचणी येतात.