शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

कृषी पंपांचा वीजपुरवठा तोडल्याने मनसेचा तहसीलमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुक्यातील २६ गावांतील शेतक-यांना महावितरणने कोणतीही नोटीस न देता ...

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुक्यातील २६ गावांतील शेतक-यांना महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. नियमाने वीज तोडण्यापूर्वी १५ दिवस अगोदर संबंधित शेतक-यांस नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, महावितरणने कायद्याकडे दुर्लक्ष करीत गावे अंधारात ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

यावर्षी रब्बीची पिके जोरात असताना वीज तोडण्यात आल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यातच काही गावांतील ट्रान्सफॉर्मर जाळले आहे. अनेक ठिकाणच्या विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर धोकादायक स्थितीत आहेत. महावितरण त्याकडे पाहतही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पीकविमा अद्यापही जाहीर झाला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तुळशीदास माने, मारोती पाटील, बाळू बाचपल्ले, धोंडिराम भंडारे, दगडू शेवाळे, बालाजी तोटावळे, जगन्नाथ चाटे, विलास शेवाळे, शंकर पाटील, नंदू सुडे, कृष्णा बेंबडे, हनुमंत तत्तापूरे, माधव कोंबडे, विष्णू बोबडे आदी उपस्थित होते.

शेतक-यांचे प्रश्न सोडविले जातील...

ज्या गावात ट्रान्सफॉर्मरची गरज आहे, तिथे लवकरच ट्रान्सफॉर्मर देण्यात येईल. विजेची जास्तीची आलेली बिले कमी करून दिले जातील. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे उपविभागीय अभियंता अभिजित अडगुबे यांनी सांगितले.

शासनाने केलेले पंचनामे गृहित धरून त्वरित पीकविमा वाटप करण्यात यावा, अशी मागणी डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली. दरम्यान, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर मनसेने आपले ठिय्या आंदोलन थांबविले.