शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपांचा वीजपुरवठा तोडल्याने मनसेचा तहसीलमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुक्यातील २६ गावांतील शेतक-यांना महावितरणने कोणतीही नोटीस न देता ...

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुक्यातील २६ गावांतील शेतक-यांना महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. नियमाने वीज तोडण्यापूर्वी १५ दिवस अगोदर संबंधित शेतक-यांस नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, महावितरणने कायद्याकडे दुर्लक्ष करीत गावे अंधारात ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

यावर्षी रब्बीची पिके जोरात असताना वीज तोडण्यात आल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यातच काही गावांतील ट्रान्सफॉर्मर जाळले आहे. अनेक ठिकाणच्या विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर धोकादायक स्थितीत आहेत. महावितरण त्याकडे पाहतही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पीकविमा अद्यापही जाहीर झाला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तुळशीदास माने, मारोती पाटील, बाळू बाचपल्ले, धोंडिराम भंडारे, दगडू शेवाळे, बालाजी तोटावळे, जगन्नाथ चाटे, विलास शेवाळे, शंकर पाटील, नंदू सुडे, कृष्णा बेंबडे, हनुमंत तत्तापूरे, माधव कोंबडे, विष्णू बोबडे आदी उपस्थित होते.

शेतक-यांचे प्रश्न सोडविले जातील...

ज्या गावात ट्रान्सफॉर्मरची गरज आहे, तिथे लवकरच ट्रान्सफॉर्मर देण्यात येईल. विजेची जास्तीची आलेली बिले कमी करून दिले जातील. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे उपविभागीय अभियंता अभिजित अडगुबे यांनी सांगितले.

शासनाने केलेले पंचनामे गृहित धरून त्वरित पीकविमा वाटप करण्यात यावा, अशी मागणी डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली. दरम्यान, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर मनसेने आपले ठिय्या आंदोलन थांबविले.