शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

कृषी पंपांचा वीजपुरवठा तोडल्याने मनसेचा तहसीलमध्ये ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:19 IST

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुक्यातील २६ गावांतील शेतक-यांना महावितरणने कोणतीही नोटीस न देता ...

मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुक्यातील २६ गावांतील शेतक-यांना महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. नियमाने वीज तोडण्यापूर्वी १५ दिवस अगोदर संबंधित शेतक-यांस नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, महावितरणने कायद्याकडे दुर्लक्ष करीत गावे अंधारात ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

यावर्षी रब्बीची पिके जोरात असताना वीज तोडण्यात आल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यातच काही गावांतील ट्रान्सफॉर्मर जाळले आहे. अनेक ठिकाणच्या विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर धोकादायक स्थितीत आहेत. महावितरण त्याकडे पाहतही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पीकविमा अद्यापही जाहीर झाला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तुळशीदास माने, मारोती पाटील, बाळू बाचपल्ले, धोंडिराम भंडारे, दगडू शेवाळे, बालाजी तोटावळे, जगन्नाथ चाटे, विलास शेवाळे, शंकर पाटील, नंदू सुडे, कृष्णा बेंबडे, हनुमंत तत्तापूरे, माधव कोंबडे, विष्णू बोबडे आदी उपस्थित होते.

शेतक-यांचे प्रश्न सोडविले जातील...

ज्या गावात ट्रान्सफॉर्मरची गरज आहे, तिथे लवकरच ट्रान्सफॉर्मर देण्यात येईल. विजेची जास्तीची आलेली बिले कमी करून दिले जातील. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे उपविभागीय अभियंता अभिजित अडगुबे यांनी सांगितले.

शासनाने केलेले पंचनामे गृहित धरून त्वरित पीकविमा वाटप करण्यात यावा, अशी मागणी डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली. दरम्यान, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर मनसेने आपले ठिय्या आंदोलन थांबविले.