शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी मिशन स्वाभिमान, लातूर झेडपीची विशेष कर वसुली मोहीम

By हरी मोकाशे | Updated: November 22, 2023 18:38 IST

तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली केल्यास गौरव करण्यात येणार आहे.

लातूर : ग्रामपंचायतींचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि गावातील नागरिकांना आवश्यक त्या सोयी- सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत दर महिन्यातील एका विशिष्ठ दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली केली जाणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. मात्र, बहुतांश वेळा योजनेंतर्गतचा निधी कमी पडतो. तर काही वेळेस निधी उपलब्ध असूनही त्याचा गरजेच्या ठिकाणी वापर करण्यास नियमांचा अडसर येतो. त्यामुळे गावातील काही भाग अथवा संपूर्ण गाव आवश्यक त्या सुविधेपासून वंचित राहते. त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतीचा भरणा केलेला कर उपयोगी पडतो. शिवाय, ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होते.

जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी आणि गावातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात विशेष कर वसुली मोहीम राबविली जाणार आहे.

१० लाखांच्या विकास कामांचे बक्षीस...कर वसुली दिनात एक लाख अथवा त्यापेक्षा अधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसेवकाची त्यांच्या गोपनीय अहवालात नोंद केली जाणार आहे. सलग तीन महिने एक लाखापेक्षा अधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात शंभर टक्के कर वसुली करणाऱ्या ३ हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्याबरोबरच १० लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली जाणार आहे. तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली केल्यास गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वसुलीत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस १० लाख, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गावास ७ लाख तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात येणार आहे.

२९ नोव्हेंबर रोजी विशेष कर वसुली मोहीम...प्रत्येक महिन्यातील एका दिवशी विशेष कर वसुली दिन राबविण्यात येणार आहे. २९ नोव्हेंबर, २३ डिसेंबर, २३ जानेवारी २०२४, २३ फेब्रुवारी या दिवशी विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत कर वसुली पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींना प्रोत्साहन...गावातील नागरिकांनी कर भरणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची कर वसुली होईल आणि त्याचा लाभ गावातील नागरिकांनाच होईल. शिवाय, शंभर टक्के वसुली बद्दल ग्रामपंचायतींना विकास निधीही दिला जाणार आहे. त्यातून ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळेल.- अनमोल सागर, सीईओ

विशेष पथकांची नियुक्ती...सीईओ अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुलीचे नियोजन करावे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ, पंचायत.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद