शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ग्रामपंचायतीच्या उत्पन्न वाढीसाठी मिशन स्वाभिमान, लातूर झेडपीची विशेष कर वसुली मोहीम

By हरी मोकाशे | Updated: November 22, 2023 18:38 IST

तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली केल्यास गौरव करण्यात येणार आहे.

लातूर : ग्रामपंचायतींचे आर्थिक उत्पन्न वाढावे आणि गावातील नागरिकांना आवश्यक त्या सोयी- सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत दर महिन्यातील एका विशिष्ठ दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत पाणीपट्टी, घरपट्टी कर वसुली केली जाणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहे. मात्र, बहुतांश वेळा योजनेंतर्गतचा निधी कमी पडतो. तर काही वेळेस निधी उपलब्ध असूनही त्याचा गरजेच्या ठिकाणी वापर करण्यास नियमांचा अडसर येतो. त्यामुळे गावातील काही भाग अथवा संपूर्ण गाव आवश्यक त्या सुविधेपासून वंचित राहते. त्या सुविधा तत्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामपंचायतीचा भरणा केलेला कर उपयोगी पडतो. शिवाय, ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नातही वाढ होते.

जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी आणि गावातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन स्वाभिमान अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात विशेष कर वसुली मोहीम राबविली जाणार आहे.

१० लाखांच्या विकास कामांचे बक्षीस...कर वसुली दिनात एक लाख अथवा त्यापेक्षा अधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसेवकाची त्यांच्या गोपनीय अहवालात नोंद केली जाणार आहे. सलग तीन महिने एक लाखापेक्षा अधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात शंभर टक्के कर वसुली करणाऱ्या ३ हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचा सन्मान करण्याबरोबरच १० लाख रुपयांची विकास कामे मंजूर केली जाणार आहे. तीन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुली केल्यास गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वसुलीत प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीस १० लाख, द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या गावास ७ लाख तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतीस ५ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात येणार आहे.

२९ नोव्हेंबर रोजी विशेष कर वसुली मोहीम...प्रत्येक महिन्यातील एका दिवशी विशेष कर वसुली दिन राबविण्यात येणार आहे. २९ नोव्हेंबर, २३ डिसेंबर, २३ जानेवारी २०२४, २३ फेब्रुवारी या दिवशी विशेष कर वसुली मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत कर वसुली पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतींना प्रोत्साहन...गावातील नागरिकांनी कर भरणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची कर वसुली होईल आणि त्याचा लाभ गावातील नागरिकांनाच होईल. शिवाय, शंभर टक्के वसुली बद्दल ग्रामपंचायतींना विकास निधीही दिला जाणार आहे. त्यातून ग्रामपंचायतींना प्रोत्साहन मिळेल.- अनमोल सागर, सीईओ

विशेष पथकांची नियुक्ती...सीईओ अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन स्वाभिमान मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के कर वसुलीचे नियोजन करावे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ, पंचायत.

टॅग्स :laturलातूरLatur z pलातूर जिल्हा परिषद