शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यातील १७४० ...

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यातील १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज प्राप्त झाले असून, राज्यस्तरावर एकच सोडत काढण्यात आली आहे. मात्र, लॉटरी निघालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप निवडीचे संदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे संदेश कधी मिळणार असा सवाल पालक, विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. यामध्ये १७४० जागा असून, ३० मार्च ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. तोपर्यंत ४०२४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, निवडीचे संदेश पालकांना प्राप्त झालेले नाहीत. आरटीईच्या संकेतस्थळावर १५ एप्रिलनंतर संदेश पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात २३८ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १६, औसा २०, चाकूर १४, देवणी ८, जळकोट ४, लातूर ५४, लातूर यूआरसी १- १५, लातूर यूआरसी २- ३७, निलंगा २८, रेणापूर ८, शिरूर अनंतपाळ २ तर उदगीर तालुक्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ४०२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

संदेश मिळाल्यानंतर घेता येणार प्रवेश...

मोफत प्रवेशासाठी राज्यस्तरावर सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, निवडीचे संदेश पाठवलेले नाहीत. संदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा लागणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लवकरच निवडीचे संदेश मिळतील...

जिल्ह्यात १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज आले होते. राज्यस्तरावर सोडत जाहीर झाली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार गुरुवारपासून निवड झालेल्या पालक, विद्यार्थ्यांना संदेश प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार असून, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे यांनी सांगितले.