शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

आरटीई सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यातील १७४० ...

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यातील १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज प्राप्त झाले असून, राज्यस्तरावर एकच सोडत काढण्यात आली आहे. मात्र, लॉटरी निघालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप निवडीचे संदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे संदेश कधी मिळणार असा सवाल पालक, विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. यामध्ये १७४० जागा असून, ३० मार्च ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. तोपर्यंत ४०२४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, निवडीचे संदेश पालकांना प्राप्त झालेले नाहीत. आरटीईच्या संकेतस्थळावर १५ एप्रिलनंतर संदेश पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात २३८ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १६, औसा २०, चाकूर १४, देवणी ८, जळकोट ४, लातूर ५४, लातूर यूआरसी १- १५, लातूर यूआरसी २- ३७, निलंगा २८, रेणापूर ८, शिरूर अनंतपाळ २ तर उदगीर तालुक्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ४०२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

संदेश मिळाल्यानंतर घेता येणार प्रवेश...

मोफत प्रवेशासाठी राज्यस्तरावर सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, निवडीचे संदेश पाठवलेले नाहीत. संदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा लागणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लवकरच निवडीचे संदेश मिळतील...

जिल्ह्यात १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज आले होते. राज्यस्तरावर सोडत जाहीर झाली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार गुरुवारपासून निवड झालेल्या पालक, विद्यार्थ्यांना संदेश प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार असून, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे यांनी सांगितले.