शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

आरटीई सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यातील १७४० ...

लातूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यातील १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज प्राप्त झाले असून, राज्यस्तरावर एकच सोडत काढण्यात आली आहे. मात्र, लॉटरी निघालेल्या विद्यार्थ्यांना अद्याप निवडीचे संदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे संदेश कधी मिळणार असा सवाल पालक, विद्यार्थ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी २३८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली आहे. यामध्ये १७४० जागा असून, ३० मार्च ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. तोपर्यंत ४०२४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी राज्यस्तरावर एकच सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, निवडीचे संदेश पालकांना प्राप्त झालेले नाहीत. आरटीईच्या संकेतस्थळावर १५ एप्रिलनंतर संदेश पाठविले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात २३८ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यामध्ये अहमदपूर तालुक्यातील १६, औसा २०, चाकूर १४, देवणी ८, जळकोट ४, लातूर ५४, लातूर यूआरसी १- १५, लातूर यूआरसी २- ३७, निलंगा २८, रेणापूर ८, शिरूर अनंतपाळ २ तर उदगीर तालुक्यातील ३२ शाळांचा समावेश आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ ४०२४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

संदेश मिळाल्यानंतर घेता येणार प्रवेश...

मोफत प्रवेशासाठी राज्यस्तरावर सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, निवडीचे संदेश पाठवलेले नाहीत. संदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शाळेत कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा लागणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

लवकरच निवडीचे संदेश मिळतील...

जिल्ह्यात १७४० जागांसाठी ४०२४ अर्ज आले होते. राज्यस्तरावर सोडत जाहीर झाली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार गुरुवारपासून निवड झालेल्या पालक, विद्यार्थ्यांना संदेश प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर शाळेत प्रवेश निश्चित करावे लागणार असून, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणविस्तार अधिकारी दिलीप हैबतपुरे यांनी सांगितले.