शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वादळी वाऱ्याच्या तडाख्याने पूर्णत्वास आलेले मंगल कार्यालय भुईसपाट

By संदीप शिंदे | Updated: May 23, 2024 19:49 IST

लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील घटना : ७० टक्के उभारणी झाली होती पूर्ण

मुरुड (जि. लातूर) : लातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात ७० टक्के उभारणी पूर्ण झालेले मंगल कार्यालय भुईसपाट झाले आहे. मात्र, सुदैवाने मंगल कार्यालय कोसळले तेव्हा तिथे मजूर किंवा इतर कोणीही नव्हते. परिणामी, जीवितहानी झाली नाही. परंतू, मंगल कार्यालयावरील सर्वच पत्र्यांचा चोळामोळा झाला असून, ॲन्गल उखडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

मुरुड परिसरातील एमआयडीसी भागात प्रसन्नकुमार लक्ष्मणराव कांबळे यांच्या मंगल कार्यालयाचे बांधकाम चार महिन्यांपासून सुरु आहे. त्यासाठी ७० टक्के काम पुर्ण झाले होते. केवळ भिंतीचे काम बाकी होते. मात्र, गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मुरुड परिसराला चांगलेच झोडपले असून, रस्त्यावरील बोर्डचेही मोठे नुकसान झाले आहे. एमआयडीसी परिसरात मागील चार महिन्यांपासून मंगल कार्यालयाचे बांधकाम सुरु होते. चार मजूर मंगल कार्यालय उभारणीचे काम करीत होते. कार्यालय कोसळले त्यावेळी सर्वच मजूर जेवणासाठी घरी गेले होते. मंगल कार्यालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रसन्नकुमार कांबळे म्हणाले.

रस्त्यावरील होर्डिंग, झाडे पडली...मुरुड परिसरात गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लातूररोडवरील होर्डिंग पडले असून, मार्केट रोडसह परिसरात झाडे कोसळली आहेत. अवकाळी पावसामुळे अनेक भागातील वीजपुरवठा काहीवेळ खंडीत झाला होता. दुपारच्या वेळी आलेल्या वादळामुळे बाजारपेठेतही धावपळ उडाली. ग्रामीण भागातून खरेदीसाठी आलेले अनेक ग्राहक वादळी-वारे बंद होताच गावाकडे परतले.

टॅग्स :laturलातूर