शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पालकांचे छत्र हरवलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST

राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचा स्तुत्य उपक्रम लातूर : कोरोना महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा ...

राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचा स्तुत्य उपक्रम

लातूर : कोरोना महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे ज्यांच्या आई किंवा वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी दिली आहे.

कोरोनाच्या महामारीत लेकरांपासून आई-वडिलांची तर आई-वडिलांपासून लेकरांची ताटातूट होत आहे. त्यामुळे या हृदयस्पर्शी वातावरणात आपणही समाजाचे काही देणं लागतो, या सामाजिक भावनेतून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी अशा लेकरांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोनाचा आधार घेऊन अनेकांना आर्थिकदृष्ट्या लुटण्याचे प्रकार आपण पाहत व ऐकत आहोत; मात्र राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुल याला अपवाद आहे. पूर्वीपासून या संकुलात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासह त्यांना गणवेश, शालेय साहित्य वाटपही करण्यात येते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे अशा सामाजिक दृष्टिकोनातून या संस्थेची वाटचाल सुरू आहे. आता कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे. कोरोनामुळे ज्यांच्या आई किंवा वडिलांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. इयत्ता अकरावी व बारावीतील कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचा यात समावेश असल्याची माहितीही प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी दिली असून, याचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.