शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Lok Sabha Election 2019 : लातुरात निलंगेकर, देशमुखांची प्रतिष्ठा पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:21 IST

ग्राउंड रिपोर्ट : काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांची १५ दिवसांच्या प्रचारात होणार दमछाक 

- हणमंत गायकवाड

लातूर : काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची दमछाक करणारी लातूर लोकसभा राखीव मतदारसंघातील लढाई चुरशीची होणार आहे. भाजपमधील उमेदवारीवरून झालेला वाद आणि काँग्रेसमध्ये उमेदवार कोण, यावर झालेला संभ्रम दूर झाला असून, आता लढत दुरंगी होणार की तिरंगी, हे प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात कळणार आहे. 

काँग्रेसकडून मच्छिंद्र कामंत, भाजपकडून सुधाकर शृंगारे तर वंचित बहुजन आघाडीकडून राम गारकर मैदानात आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण दहा उमेदवार आता रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपाने प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा घेऊन प्रचाराचा औपचारिक प्रारंभ केला, परंतु रणधुमाळीसाठी दोन्ही मुख्य पक्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करीत आहेत की काय, असेच सध्या तरी वातावरण आहे. उमेदवार आघाडी आणि युतीतील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त आहेत. कार्यकर्ते मात्र प्रचार आदेशाच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत. 

लातूरची लढाई कामंत विरुद्ध शृंगारे रंगणार असली, तरी माजी राज्यमंत्री आ. अमित देशमुख आणि पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याच प्रतिष्ठेची राहणार आहे.  मच्छिंद्र कामंत यांचे वक्तृत्व, शिक्षण आणि पहिल्याच मुलाखतीतील त्यांनी सांगितलेला सर्वधर्मसमभावाचा विचार हा लातूर लोकसभेच्या राजकीय परंपरेला साजेसा आहे, ही त्यांची जमेची बाजू, परंतु उदगीर, जळकोट विधानसभा मतदारसंघातील निवडणूक वगळता तुटलेला संपर्क ते पुन्हा कसा जोडतात, हे आव्हान आहे. 

भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून संपर्क ठेवला. काही सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमधून थेट संवाद निर्माण केला. इतकेच नव्हे, स्थानिक नेतृत्वाचे पाठबळ सर्वार्थाने लाभले, ही जमेची बाजू. पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांशी त्यांना संवाद आहे, परंतु सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत हा संवाद कसा न्यायचा, हे आव्हान त्यांच्यापुढे आहे. काँग्रेस, भाजपच्या लढाईत वंचित बहुजन आघाडीचे राम गारकरही चर्चेत राहणार आहेत. तूर्त वातावरणातील गरमी वाढली असली, तरी सर्व उमेदवारांचा प्रचार थंड आहे. तो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच रंगात येईल.

प्रमुख उमेदवार : मच्छिंद्र कामंत । काँग्रेससुधाकर शृंगारे । भाजपराम गारकर । वंचित आघाडी

कळीचे मुद्दे२०१४ च्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या खासदारांना तिकीट नाकारून भाजपाने नवा चेहरा दिला आहे. मतदारसंघात प्रदीर्घ काळ चर्चेत राहिलेल्या नावांना पूर्णविराम देत काँग्रेसनेही नवा चेहरा मैदानात उतरविला आहे.

स्थानिक नेत्यांचा प्रभाव शिवराज पाटील चाकूरकर यांच्यासारख्या प्रगल्भ नेतृत्वाने लातूरचे प्रतिनिधित्व संसदेत केले आहे. उमेदवाराचे व्हिजन आणि विचार याला प्राधान्य देणारी इथली जनता आहे. तसेच आघाडीतील पक्षांची एकजूट, कार्यकर्त्यांचे जाळे, स्थानिक नेत्यांचा जनमानसातील प्रभाव पाठीशी आहे.- मच्छिंद्र कामंत, काँग्रेस

भाजपला साथपालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे समर्थन आणि पक्षातील नेते, कार्यकर्त्यांचे पाठबळ आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात संवाद आहे. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमधून थेट जनतेशी संपर्क ठेवला. मोठ्या मताधिक्याने भाजपाला साथ देणारा हा मतदारसंघ आहे.- सुधाकर शृंगारे, भाजप

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकlatur-pcलातूरPoliticsराजकारण