शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

लातूरात पशुधन ५ लाख अन् ईअर टॅगिंग केले ६ लाख; तरीही काम अपूर्णच!

By हरी मोकाशे | Updated: May 20, 2024 18:39 IST

लातूर जिल्हा परिषद, पशुसंवर्धनचे कर्मचारी पोहोचताहेत गोठ्यागोठ्यात

लातूर : राज्य शासनाने प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने काही महिन्यांपासून पशुधनाचे आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख ११ हजार ६५० पशुधन असतानाही पशुसंवर्धनने उद्दिष्टपूर्तीपेक्षा अधिक काम करीत ६ लाख ८ हजार ईअर टॅगिंग केले आहे. मात्र, अद्यापही हे काम अपूर्णच असल्याने अधिकारी, कर्मचारी हतबल होत आहेत.

भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि कानावर शिक्का असल्याशिवाय कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी- विक्री, उपचार केले जाणार नाही. त्यामुळे येत्या १ जूनपर्यंत पशुधनाचे आधारकार्ड काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जवळपास सन २०१६- १७ पासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाचे आधारकार्ड काढून घ्यावे म्हणून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.

औसा तालुक्यात सर्वाधिक पशुधन...तालुका - पशुधनअहमदपूर - ६५ हजार ७२९औसा - ७६ हजार ६२२चाकूर - ५१ हजार ९९९देवणी - ३० हजार २४६जळकोट - २६ हजार ३९७लातूर - ७० हजार ६१६निलंगा - ६८ हजार ३७६रेणापूर - ४७ हजार १९९शिरुर अनं. - २० हजार ८२७उदगीर - ५३ हजार ६३९एकूण - ५ लाख ११ हजार ६५०

ईअर टॅगिंग नसल्यास उपचारही नाही...शासनाने प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग बंधनकारक केले आहे. वास्तविक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन घेणे आवश्यक आहे. ईअर टॅगिंगमुळे नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का अथवा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पशुधन दगावल्यास त्या पशुधनाच्या मालकास नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच खरेदी- विक्री करणे सोयीचे होणार आहे. ईअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर पशूधन खरेदी- विक्री करता येणार नाही. तसेच शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारही केले जाणार नाहीत.

पशुपालकांचा हलगर्जीपणा, ईअर टॅगिंगचे काम संपेना...सुरुवातीस बहुतांश पशुपालकांमध्ये ईअर टॅगिंगसंदर्भात उदासीनता होती. त्यांना यासंदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. मात्र, काही पशुपालक ईअर टॅगिंग करतात आणि त्यानंतर ते टॅग काढून टाकतात. तसेच काही वेळेस खरेदी- विक्रीवेळी टॅग काढून टाकण्यात येते. अशा समस्यांमुळे पशुधनाच्या तुलनेत टॅगिंगचे काम अधिक प्रमाणात झाल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.

पशुपालकांनी पशुधनाचे आधारकार्ड काढून घ्यावे...पशुधन आधारकार्ड काढण्यासाठी सातत्याने जनजागृती करुन मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ लाख ११ हजार पशुधन असून ६ लाख ८ हजार टॅगिंग करण्यात आले आहे. ईअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर कुठल्याही मोफत सुविधा, योजना पशुपालकांना मिळणार नाही. त्यामुळे पशुधनास ईअर टॅगिंग करुन घ्यावे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र