शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

लातूरात पशुधन ५ लाख अन् ईअर टॅगिंग केले ६ लाख; तरीही काम अपूर्णच!

By हरी मोकाशे | Updated: May 20, 2024 18:39 IST

लातूर जिल्हा परिषद, पशुसंवर्धनचे कर्मचारी पोहोचताहेत गोठ्यागोठ्यात

लातूर : राज्य शासनाने प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग करणे बंधनकारक केल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने काही महिन्यांपासून पशुधनाचे आधारकार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख ११ हजार ६५० पशुधन असतानाही पशुसंवर्धनने उद्दिष्टपूर्तीपेक्षा अधिक काम करीत ६ लाख ८ हजार ईअर टॅगिंग केले आहे. मात्र, अद्यापही हे काम अपूर्णच असल्याने अधिकारी, कर्मचारी हतबल होत आहेत.

भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि कानावर शिक्का असल्याशिवाय कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी- विक्री, उपचार केले जाणार नाही. त्यामुळे येत्या १ जूनपर्यंत पशुधनाचे आधारकार्ड काढून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने जवळपास सन २०१६- १७ पासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाचे आधारकार्ड काढून घ्यावे म्हणून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.

औसा तालुक्यात सर्वाधिक पशुधन...तालुका - पशुधनअहमदपूर - ६५ हजार ७२९औसा - ७६ हजार ६२२चाकूर - ५१ हजार ९९९देवणी - ३० हजार २४६जळकोट - २६ हजार ३९७लातूर - ७० हजार ६१६निलंगा - ६८ हजार ३७६रेणापूर - ४७ हजार १९९शिरुर अनं. - २० हजार ८२७उदगीर - ५३ हजार ६३९एकूण - ५ लाख ११ हजार ६५०

ईअर टॅगिंग नसल्यास उपचारही नाही...शासनाने प्रत्येक पशुधनास ईअर टॅगिंग बंधनकारक केले आहे. वास्तविक विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन घेणे आवश्यक आहे. ईअर टॅगिंगमुळे नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का अथवा वन्य प्राण्याच्या हल्ल्यात पशुधन दगावल्यास त्या पशुधनाच्या मालकास नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच खरेदी- विक्री करणे सोयीचे होणार आहे. ईअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर पशूधन खरेदी- विक्री करता येणार नाही. तसेच शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारही केले जाणार नाहीत.

पशुपालकांचा हलगर्जीपणा, ईअर टॅगिंगचे काम संपेना...सुरुवातीस बहुतांश पशुपालकांमध्ये ईअर टॅगिंगसंदर्भात उदासीनता होती. त्यांना यासंदर्भात माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. मात्र, काही पशुपालक ईअर टॅगिंग करतात आणि त्यानंतर ते टॅग काढून टाकतात. तसेच काही वेळेस खरेदी- विक्रीवेळी टॅग काढून टाकण्यात येते. अशा समस्यांमुळे पशुधनाच्या तुलनेत टॅगिंगचे काम अधिक प्रमाणात झाल्याचे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.

पशुपालकांनी पशुधनाचे आधारकार्ड काढून घ्यावे...पशुधन आधारकार्ड काढण्यासाठी सातत्याने जनजागृती करुन मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ लाख ११ हजार पशुधन असून ६ लाख ८ हजार टॅगिंग करण्यात आले आहे. ईअर टॅगिंग नसल्यास १ जूननंतर कुठल्याही मोफत सुविधा, योजना पशुपालकांना मिळणार नाही. त्यामुळे पशुधनास ईअर टॅगिंग करुन घ्यावे.- डॉ. श्रीधर शिंदे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.

टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र