शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

जिल्ह्यातील आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST

परवाना रद्द करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये काटगाव येथील अमित फर्टिलायझर्स, अक्षय फर्टिलायझर्स, रेणापूर तालुक्यातील पिंपळ फाटा येथील श्रवणकुमार कृषी सेवा ...

परवाना रद्द करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये काटगाव येथील अमित फर्टिलायझर्स, अक्षय फर्टिलायझर्स, रेणापूर तालुक्यातील पिंपळ फाटा येथील श्रवणकुमार कृषी सेवा केंद्र, पळशी येथील ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्र, शांताई कृषी सेवा केंद्र, चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे ओमसाई कृषी सेवा केंद्र, न्यू सावली कृषी सेवा केंद्र निलंगा या दुकानांचा समावेश आहे. या दुकानांचा तपासणी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात प्राप्त झाला होता. त्यानुसार १५ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सुनावणी आयोजित केली होती. त्यामध्ये विक्री परवाना दर्शनी जागी न लावणे, बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांचे स्त्रोत न ठेवणे, साठा रजिस्टर अद्ययावत न करणे, साठाफलक व भावफलक प्रदर्शित न करणे, विक्री बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे, विक्री बिल परिपूर्ण न देणे, वजनकाटा दुकानात न ठेवणे, ई-पॉस मशीनवरील खतसाठा अद्ययावत न करणे, खरेदी बिले न ठेवणे आदी त्रुटी आढळून आल्या आहेत.

दरम्यान, सदर विक्रेत्यांनी बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, खत नियंत्रण आदेश १९८५, कीटकनाशक कायदा १९६८ व कीटकनाशक नियम १९७१ च्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी या आठ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत. यापुढे कृषी सेवा केंद्रात त्रुटी आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिला आहे.