शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर : डाळवर्गीय धान्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आयातीला परवानगी दिली. त्यामुळे मागील आठवड्यापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उदगीर : डाळवर्गीय धान्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आयातीला परवानगी दिली. त्यामुळे मागील आठवड्यापासून दरात घसरण होत असल्याचे उदगीर बाजार समितीत शनिवार व रविवारी दिसून आले. शनिवारच्या सौद्यात हरभऱ्याला प्रति क्विंटलमागे हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी मिळाले, तर सोयाबीन व तुरीच्या दरातही घसरण झाली. खरिपाच्या तोंडावर शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, सौद्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांकडे व्यापाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे.

सीमावर्ती भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या उदगीरच्या मार्केट यार्डात शेतमालाची आवक वाढली आहे. मागील महिन्यात हरभरा ५ हजार ३०० रुपये, सोयाबीन ७ हजार ७०० रुपये तर तुरीचा प्रतिक्विंटल दर ७ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. हवामान खात्याने यावर्षी सर्वसाधारण पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. जून महिना तोंडावर आल्याने पेरणीच्या खर्चासाठी शेतकरी आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, केंद्र सरकारने डाळवर्गीय धान्याचे दर वाढत असल्याचे कारण देत विदेशातून आयातीला परवानगी दिली. त्यामुळे हरभऱ्याचे दर ५०० रुपये तर तूर व सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हमीभाव खरेदी केंद्र २५ मेपर्यंत सुरु ठेवण्याची मुदत असल्याने किमान हमीभाव केंद्राला सरकारने मुदतवाढ द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

तीन राज्यांच्या सीमेवरील असलेल्या उदगीरच्या मार्केट यार्डात नांदेड जिल्ह्यातील काही गावांतून शेतमालाची आवक होत आहे. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने शहरातील सर्वच बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम लागू करुन बाजार समितीतील व्यवहाराला परवानगी दिली आहे. त्यावर पालिकेने लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे. परंतु, येथील मोढ्यांत कुठलेही नियम पाळले जात नाहीत. व्यापाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सकाळी सौद्यावेळी अक्षरशः यात्रेसारखी गर्दी दिसते. याकडे बाजार समितीने लक्ष देण्याची गरज आहे. ज्यामुळे बाहेरगावाहून शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह बाजारातील अन्य घटकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.

मास्कचा वापर करुन व्यवहार...

दररोज सकाळी ११ वाजता सौदा निघतो. काहीही केल्यास तासभर सौद्यात गर्दी होतेच. ती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मात्र, फारसा उपयोग होत नाही. परंतु, प्रत्येकजण चेहऱ्याला मास्क लावूनच व्यवहार करतो.

- संभाजी घोगरे, अध्यक्ष, आडत असोसिएशन.

व्यापाऱ्यांना वारंवार सूचना...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी सतत प्रयत्न करत आहेत. परंतु, व्यापारी ऐकत नाहीत. त्यासाठी मंगळवारपासून काही नवीन भूमिका घेतली जाईल.

- एन. डी. हंगरगे, प्रभारी सचिव.