शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कुस्ती कलेचा वारसा जपणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 19:55 IST

सैराटफेम तानाजी गलगुंडे यांच्याशी बातचित

ठळक मुद्दे क्रिकेट प्रमाणेच कुस्तीलाही प्रसिद्धी मिळणे गरजेचे शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी खेळ महत्त्वाचा

- महेश पाळणे  

लातूर : महाराष्ट्राला कुस्तीकलेचा वारसा आहे़ क्रिकेट, कबड्डी प्रमाणे कुस्तीलाही चांगले दिवस आले आहेत़ हा वारसा तरूण मल्लांनी जपला पाहिजे, असे तानाजी गलगुंडेंनी सांगितले़ 

लातूर तालुक्यातील साई येथे कुस्ती स्पर्धेसाठी सैराट फेम तानाजी गलगुंडे (लंगड्या) आला असता त्याने ‘लोकमत’शी बातचित केली़ यावेळी तो म्हणाला, मलाही लहानपणापासून कुस्तीची आवड होती़ माझे मित्र व मामाचे मुलं कुस्ती खेळत होते़ त्यामुळे मी ही आखाड्यात जायचो़ त्यामुळे माझे कुस्तीवर प्रेम आहे़ दंगल चित्रपटामुळे कुस्ती घराघरात पोहोचली असून, क्रिकेट प्रमाणेच कुस्तीलाही प्रसिद्धी मिळणे गरजेचे आहे़ त्यामुळे अधिकाधिक खेळाडू कुस्तीकडे आकर्षिले जातील़ अभिनयाविषयी बोलले असता तो म्हणाला, दक्षिणात्य कन्नड चित्रपटात सध्या काम करत असून, कोणत्याही भाषेत चित्रपट करण्याची माझी तयारी आहे़ यासह मराठीतील बिस्कीट व नागराज मंजुळेच्या आगामी झुंड या हिंदी चित्रपटात अभिनय करत असल्याचेही त्याने सांगितले़ शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे़ मनुष्य हा बुद्धीमान माणूस आहे़ त्यामुळे आपल्या बुद्धीचा वापर करून क्रीडा क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे़ अर्जून पुरस्कार विजेते काका पवार यांनी कुस्तीत मोलाचे योगदान दिले आहे़ त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला पदक मिळवून देत आहेत़ साई गावात मिळालेल्या प्रेमामुळे भारावून गेले असल्याचेही त्यांनी सांगितले़

काजू, बदाम खा़सैराट चित्रपटात गुटखा खाल्यानंतर आर्चीने रागविल्याचे सांगून तो सीन सिनेमापुरता मर्यादित होता़ मात्र खऱ्या जीवनात युवकांनी व्यसनापासून दूर रहावे़ काजू, बदाम खाऊन आपली शरीरयष्टी कशी बलवान बनेल, हे पाहणे महत्त्वाचे असल्याचेही त्याने सांगितले़ व्यसनावरील पैसा व्यर्थ असून, तो खर्च वळवून शरीराकडे द्यावा, असेही तो म्हणाला़

अभिनयातून बरेच शिकायला मिळालेकन्नड चित्रपटात काम करताना भाषेचा त्रास झाला़ मात्र अभिनय महत्त्वाचा असून, कोणत्याही भाषेत चित्रपट करण्याची तयारी असून, यामुळे बरेच काही शिकायला मिळाले़ दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यामुळेच माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली असल्याचेही त्याने आवर्जुन सांगितले़

टॅग्स :Wrestlingकुस्तीlaturलातूर