शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पुण्यात तळ: अंबादास दानवे

By राजकुमार जोंधळे | Updated: February 25, 2023 17:36 IST

सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही, अशी टीका देखील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली

लातूर : पुण्यातील विधानसभेच्या दाेन मतदारसंघाची पाेटनिवडणूक जाहीर झाली असून, लवकरच मतदान हाेणार आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उर्वरित महाराष्ट्राला वाऱ्यावर साेडून, केवळ निवडणूक प्रचारासाठी आठ दिवसांपासून पुण्यात तळ ठाेकून आहेत, असा आराेप विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी लातुरात पत्रपरिषदेत केला.

राज्यभरात सध्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबाबत जनतेत संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. विविध गैरसमज परसविले जात आहेत. हे गैरसमज, संभ्रम दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने शिवगर्जना संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानासाठी विराेधी पक्षनेते अंबादास दानवे शनिवारी लातूर दाैऱ्यावर आले हाेते. यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी टीका केली. शिवाय, सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, शाेभाताई बेंजरगे, संताेष साेमवंशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती.

नामांतराबाबत संशय वाटताेय...मराठवाड्यातील औरंगादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, हे नामांतर त्या-त्या शहराचे झाले. मात्र, जिल्ह्याचे नाव केंद्र सरकारने दिलेल्या पत्रानुसार औरंगाबाद व धाराशिव असेच राहणार काय? याबाबत अंबादास दानवे यांनी संशय व्यक्त केला. सरकारचा हेतू दाेन्ही शहरांचे नामांतर करण्याचा नाही, असाही आराेप केला.

जनता उद्धव ठाकरे यांच्यासाेबत...निवडणूक आयाेगाच्या मदतीने एकनाथ शिंदे गटाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह चाेरले आहे, असा आराेप करून दानवे म्हणाले, की चिन्ह आणि नाव चाेरले असले, तरी राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्यासाेबत आहे. चाेरलेल्या नाव आणि चिन्हाचा आमच्यावर काेणताही परिणाम हाेणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :laturलातूरAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस