शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पुण्यात तळ: अंबादास दानवे

By राजकुमार जोंधळे | Updated: February 25, 2023 17:36 IST

सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही, अशी टीका देखील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली

लातूर : पुण्यातील विधानसभेच्या दाेन मतदारसंघाची पाेटनिवडणूक जाहीर झाली असून, लवकरच मतदान हाेणार आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उर्वरित महाराष्ट्राला वाऱ्यावर साेडून, केवळ निवडणूक प्रचारासाठी आठ दिवसांपासून पुण्यात तळ ठाेकून आहेत, असा आराेप विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी लातुरात पत्रपरिषदेत केला.

राज्यभरात सध्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबाबत जनतेत संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. विविध गैरसमज परसविले जात आहेत. हे गैरसमज, संभ्रम दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने शिवगर्जना संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानासाठी विराेधी पक्षनेते अंबादास दानवे शनिवारी लातूर दाैऱ्यावर आले हाेते. यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी टीका केली. शिवाय, सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, शाेभाताई बेंजरगे, संताेष साेमवंशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती.

नामांतराबाबत संशय वाटताेय...मराठवाड्यातील औरंगादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, हे नामांतर त्या-त्या शहराचे झाले. मात्र, जिल्ह्याचे नाव केंद्र सरकारने दिलेल्या पत्रानुसार औरंगाबाद व धाराशिव असेच राहणार काय? याबाबत अंबादास दानवे यांनी संशय व्यक्त केला. सरकारचा हेतू दाेन्ही शहरांचे नामांतर करण्याचा नाही, असाही आराेप केला.

जनता उद्धव ठाकरे यांच्यासाेबत...निवडणूक आयाेगाच्या मदतीने एकनाथ शिंदे गटाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह चाेरले आहे, असा आराेप करून दानवे म्हणाले, की चिन्ह आणि नाव चाेरले असले, तरी राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्यासाेबत आहे. चाेरलेल्या नाव आणि चिन्हाचा आमच्यावर काेणताही परिणाम हाेणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :laturलातूरAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस