शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा पुण्यात तळ: अंबादास दानवे

By राजकुमार जोंधळे | Updated: February 25, 2023 17:36 IST

सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही, अशी टीका देखील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली

लातूर : पुण्यातील विधानसभेच्या दाेन मतदारसंघाची पाेटनिवडणूक जाहीर झाली असून, लवकरच मतदान हाेणार आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी उर्वरित महाराष्ट्राला वाऱ्यावर साेडून, केवळ निवडणूक प्रचारासाठी आठ दिवसांपासून पुण्यात तळ ठाेकून आहेत, असा आराेप विधान परिषदेतील विराेधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी लातुरात पत्रपरिषदेत केला.

राज्यभरात सध्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाबाबत जनतेत संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. विविध गैरसमज परसविले जात आहेत. हे गैरसमज, संभ्रम दूर करण्यासाठी पक्षाच्या वतीने शिवगर्जना संपर्क अभियान सुरू केले आहे. या अभियानासाठी विराेधी पक्षनेते अंबादास दानवे शनिवारी लातूर दाैऱ्यावर आले हाेते. यावेळी ते पत्रकारांशी बाेलत हाेते. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी टीका केली. शिवाय, सरकारचे जनतेच्या विकासाकडे लक्ष नाही. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, शाेभाताई बेंजरगे, संताेष साेमवंशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती.

नामांतराबाबत संशय वाटताेय...मराठवाड्यातील औरंगादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. मात्र, हे नामांतर त्या-त्या शहराचे झाले. मात्र, जिल्ह्याचे नाव केंद्र सरकारने दिलेल्या पत्रानुसार औरंगाबाद व धाराशिव असेच राहणार काय? याबाबत अंबादास दानवे यांनी संशय व्यक्त केला. सरकारचा हेतू दाेन्ही शहरांचे नामांतर करण्याचा नाही, असाही आराेप केला.

जनता उद्धव ठाकरे यांच्यासाेबत...निवडणूक आयाेगाच्या मदतीने एकनाथ शिंदे गटाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह चाेरले आहे, असा आराेप करून दानवे म्हणाले, की चिन्ह आणि नाव चाेरले असले, तरी राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्यासाेबत आहे. चाेरलेल्या नाव आणि चिन्हाचा आमच्यावर काेणताही परिणाम हाेणार नाही, असेही ते म्हणाले.

टॅग्स :laturलातूरAmbadas Danweyअंबादास दानवेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस