शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

तिरू प्रकल्पाच्या डाव्या, उजव्या कालव्यास गळती, पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

जळकोट : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ जळकोट तालुक्यातील काही शेतकऱ्यांना होतो, परंतु ...

जळकोट : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ जळकोट तालुक्यातील काही शेतकऱ्यांना होतो, परंतु सध्या या कालव्यास भेगा पडल्याने पाण्याची गळती होऊन अपव्यय होत आहे. त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतक-यांकडून होत असून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे धाव घेऊन साकडे घातले आहे.

हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे १९७२ मध्ये मातीकाम झाले आहे. या कालव्याचा लाभ जळकोट तालुक्यातील मंगरूळ, वाढवणा खु., डांगेवाडी, घाडगेवाडी, लाळी खु., येवरी, सोनवळा, बोरगाव, एकुर्का, डोंगर कोनाळी यासह परिसरातील १० ते १५ गावांतील शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे या भागातील शेती ओलिताखाली येऊन पीक उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे दोन्ही कालवे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. या कालव्याचे मातीकाम असल्याने त्यास भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर पाण्याची गळती होऊन अपव्यय होत आहे. ही गळती रोखण्यासाठी शेतक-यांकडून सिमेंट काँक्रिटचे काम करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे वाया जात असलेले लाखो लिटर पाण्याचा शेतीसाठी उपयोग होऊन १० हजार ते १५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असे शिष्टमंडळाने सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्या नेतृत्वाखालीत शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, महारुद्र पाटील, खादर लाटवाले, मुन्शी नाजमुद्दीन, इम्तियाज शेख आदी होते.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे...

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तिरु मध्यम प्रकल्पाचे दोन्ही कालवे सिमेंट काँक्रिटचे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही कालव्याबरोबरच तिरु नदीवरील ७ बॅरेजेच्या कामास गती द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांनी सांगितले.

तत्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश...

कालव्यातून पाण्याचा अपव्यय होत असल्याने जवळपास १५ ते २० हजार हेक्टरवरील शेतीस फटका बसत आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटचे कालवे निर्माण करावेत, अशी मागणी करण्यात आली असता पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित विभागाला तत्काळ सर्व्हे करून बांधकाम करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. लवकरच हे काम करण्यात येईल, असे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.