शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

तिरू प्रकल्पाच्या डाव्या, उजव्या कालव्यास गळती, पाण्याचा अपव्यय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:18 IST

जळकोट : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ जळकोट तालुक्यातील काही शेतकऱ्यांना होतो, परंतु ...

जळकोट : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ जळकोट तालुक्यातील काही शेतकऱ्यांना होतो, परंतु सध्या या कालव्यास भेगा पडल्याने पाण्याची गळती होऊन अपव्यय होत आहे. त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतक-यांकडून होत असून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे धाव घेऊन साकडे घातले आहे.

हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे १९७२ मध्ये मातीकाम झाले आहे. या कालव्याचा लाभ जळकोट तालुक्यातील मंगरूळ, वाढवणा खु., डांगेवाडी, घाडगेवाडी, लाळी खु., येवरी, सोनवळा, बोरगाव, एकुर्का, डोंगर कोनाळी यासह परिसरातील १० ते १५ गावांतील शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे या भागातील शेती ओलिताखाली येऊन पीक उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे दोन्ही कालवे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. या कालव्याचे मातीकाम असल्याने त्यास भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर पाण्याची गळती होऊन अपव्यय होत आहे. ही गळती रोखण्यासाठी शेतक-यांकडून सिमेंट काँक्रिटचे काम करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे वाया जात असलेले लाखो लिटर पाण्याचा शेतीसाठी उपयोग होऊन १० हजार ते १५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असे शिष्टमंडळाने सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्या नेतृत्वाखालीत शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, महारुद्र पाटील, खादर लाटवाले, मुन्शी नाजमुद्दीन, इम्तियाज शेख आदी होते.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे...

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तिरु मध्यम प्रकल्पाचे दोन्ही कालवे सिमेंट काँक्रिटचे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही कालव्याबरोबरच तिरु नदीवरील ७ बॅरेजेच्या कामास गती द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांनी सांगितले.

तत्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश...

कालव्यातून पाण्याचा अपव्यय होत असल्याने जवळपास १५ ते २० हजार हेक्टरवरील शेतीस फटका बसत आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटचे कालवे निर्माण करावेत, अशी मागणी करण्यात आली असता पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित विभागाला तत्काळ सर्व्हे करून बांधकाम करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. लवकरच हे काम करण्यात येईल, असे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.