शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

लातूरकरांची चिंता वाढली! वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यात घट; मध्यम प्रकल्पात ८ टक्केच साठा

By हरी मोकाशे | Updated: March 28, 2024 19:05 IST

तावरजा, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्पातील प्रत्यक्षात उपयुक्त साठा जोत्याखाली गेला आहे.

लातूर : फाल्गुन महिन्यातच रविराजा रौद्ररुप धारण करीत आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी, मध्यम प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तावरजा, व्हटी, तिरु मध्यम प्रकल्पातील प्रत्यक्षात उपयुक्त साठा जोत्याखाली गेला आहे. उर्वरित पाच प्रकल्पांमध्ये ८.६१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

गत पावसाळ्यात अल्प पर्जन्यमान झाले. परतीचाही पाऊस झाला नाही. परिणामी, मांजरा, तेरणा, रेणा, तिरुसह जिल्ह्यातील अन्य नद्या वाहिल्या नाहीत. परिणामी, या नद्यांवर असलेल्या मध्यम प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यास डिसेंबरअखेरपासून पाणीटंचाई जाणवू लागली. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना करुन त्यास मंजुरीही दिली.

सध्या फाल्गून महिना असला तरी उन्हाचे चटके अधिक प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. शिवाय, बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे जलसाठ्यात घट होत आहे.

पाच मध्यम प्रकल्पात १० दलघमी पाणी...प्रकल्प - उपयुक्त साठा (दलघमी)तावरजा - जोखाव्हटी - जोखारेणापूर - १.७९५तिरु - जोखादेवर्जन - १.१५९साकोळ - १.६५०घरणी - २.५७७मसलगा - ३.३३६एकूण - १०.५१७

लघु प्रकल्पांमध्ये १०.५१ टक्के साठा...जिल्ह्यात लघु प्रकल्प एकूण १३४ आहेत. या प्रकल्पांमध्येही पावसाळ्यात पुरेसा जलसाठा झाला नव्हता. दरम्यान, या प्रकल्पातील पाण्याचा शेती, पशुधनासाठी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पातळीत घट झाली आहे. सध्या ३३.०१८ दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा आहे. त्याची टक्केवारी १०.५१ अशी आहे.

सर्वाधिक पाणी मसलगा प्रकल्पात...जिल्ह्यात एकूण आठ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तीन मध्यम प्रकल्पातील प्रत्यक्षात उपयुक्त जलसाठा हा जानेवारीमध्येच जोत्याखाली गेला आहे. उर्वरित पाच मध्यम प्रकल्पात ८.६१ टक्के साठा आहे. त्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा असून तो २४.५३ टक्के आहे. रेणापूर प्रकल्पात ८.७३, देवर्जनमध्ये १०.८५, साकोळ - १५.०७ आणि घरणी मध्यम प्रकल्पात ११.४७ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी पथके...जिल्ह्यातील जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या पाण्याचा अवैधरित्या उपसा होऊ नये म्हणून पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकात प्रकल्पाशी संबंधित जलसंपदा अथवा जलसंधारण विभागाचे शाखा अभियंता, महावितरणचे शाखा अभियंता, संबंधित महसूल मंडळ अधिकारी, पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी केले आहे.

 

टॅग्स :laturलातूरWaterपाणी