शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

लातूरकर घेणार पूरग्रस्त भागातील १०० विद्यार्थी दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 12:26 IST

पालकमंत्री पाटील यांचा पुढाकार 

ठळक मुद्देशिक्षणासह सुविधा पुरविणारशिक्षण विभाग देणार एक दिवसाचे वेतनदोन वर्षांसाठी शैक्षणिक मदत

लातूर : लातूर पॅटर्न अकरावी, बारावीसाठी प्रसिद्ध आहे़ नीट, जेईईसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी लातूरला येतात़ कोल्हापूर, सांगली, सातारा या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक मदत व्हावी म्हणून पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पुढाकारातून ११ वी, १२ वी साठी १०० विद्यार्थी दत्तक घेण्याचा निर्णय झाला़ यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी बैठक झाली़

या बैठकीत पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील विविध शैक्षणिक संस्था, शिकवणी वर्ग व वसतिगृह चालक विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत़ कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले़ अनेक शाळा, महाविद्यालयातील शालेय साहित्यही पुरात वाहून गेले आहे़ पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाची एक वेगळी मदत व्हावी हा यामागील हेतू आहे. लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समन्वयातून दोन वर्षे पूरग्रस्त भागातील किमान १०० विद्यार्थ्यांना ११ वी व १२ वी हे दोन वर्षे आपण शैक्षणिक सुविधा, राहणे, भोजन, कपडे, खाजगी शिकवणी आदींची सोय करणार आहोत़ ही मदत एक वेगळ्या प्रकारची असून, यातून आपले विशेष सहकार्य होईल़ त्यामुळे लातूर जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था व क्लासेस चालकांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असेही पालकमंत्री म्हणाले. 

शिक्षण विभाग देणार एक दिवसाचे वेतनमाध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसांचे वेतन सदरील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी देण्याचे बैठकीत जाहीर केले़ राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ महादेव गव्हाणे म्हणाले, महाविद्यालयाकडून कला व वाणिज्य शाखेसाठी २० ते २५ विद्यार्थ्यांची सोय केली जाईल़ याशिवाय, महाविद्यालयाकडून एक दिवसाचे वेतनही आम्ही पूरग्रस्तांना देणार आहोत़मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी १० ते १२ सर्व शाखेतील विद्यार्थ्यांचा दोन वर्षांचा खर्च उचलणार असल्याचे सांगितले़ जेएसपीएम शिक्षण संस्थेचे अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी १०, रेणुकाई पॅटर्नचे १०, डी़एऩ केंद्रे ५, श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालयाकडून १० विद्यार्थी दत्तक घेत असल्याचे संबंधितांनी यावेळी बैठकीत सांगितले़ 

दोन वर्षांसाठी शैक्षणिक मदत : लातूर शहरातील विविध शाखेत पूरग्रस्त भागातील १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल़ जेईई, नीट आदी परीक्षांची तयारीही करून घेतली जाईल़ यासाठी विद्यार्थ्यांवर होणारा संपूर्ण खर्च लोकसहभागातून होणार असून यासाठी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पुढाकार घेतला आहे़ तर जिल्हाधिकारी सर्व संस्थांशी समन्वय करीत आहेत़ विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी मदत केली जाणार आहे.

टॅग्स :floodपूरlaturलातूरEducationशिक्षणguardian ministerपालक मंत्री