शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोठा बदल, जागेचे वाद टाळण्यासाठी ग्रामपंचायतही मागविणार आता फेरफारवेळी हरकती!

By हरी मोकाशे | Updated: December 22, 2023 19:15 IST

कुठल्याही घराच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ मध्ये करणे बंधनकारक आहे.

लातूर : घरजागेच्या वादावरून नेहमीच वाद होतात. काही वेळेस ही प्रकरणे जिल्हा प्रशासनाबरोबरच न्यायालयापर्यंत पोहोचतात. परिणामी, त्यात वेळ जातो. तसेच, मानसिक ताणही सहन करावा लागतो. अशा प्रकारचे तंटे जिल्ह्यात निर्माण होऊ नयेत म्हणून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आता घरजागेच्या फेरफारची नोंद करतेवेळी हरकती मागविण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत.

कुठल्याही घराच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ मध्ये करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक जागामालक नोंदी करून घेत असतो. दरम्यान, काहीजण अधिकृत वाटणीपत्र, वारसा प्रमाणपत्र, संमतीपत्र, मृत्युपत्र अथवा खरेदीखत केलेले आवश्यक ते कागदपत्र न जोडता ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ वर नोंदी करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेस स्थानिक दबावापोटी नोंदी होतात. मात्र ,तद्नंतर तक्रारी होऊन वाद निर्माण होतात. दरम्यान, अशा तक्रारींचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी नव्याने काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसंगतपणा व सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.

फेरफार अर्जांची होणार पडताळणी...फेरफारसाठीचा अर्ज दाखल झाल्यानंतर ग्रामसेवकाने नोंदवहीत नोंद करून पोहोच देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीचा करभरणा केल्याची खात्री करून घ्यावी. अपूर्ण कागदपत्रे असल्यास सात दिवसांत लेखी पत्राद्वारे अर्जदारास कळवावे. फेरफारसाठीची आवश्यक ती कागदपत्रे जोडली असल्यास ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर त्याची माहिती डकवून हरकती मागवाव्यात.

हरकती आल्यास चौकशी करा...फेरफार अर्जासंदर्भात हरकती आल्यास सुनावणी घ्यावी तसेच चौकशी करावी. हरकती नसतील तर अर्ज मासिक सभेत ठेवावा. तद्नंतर कोणी विरोध केल्यास त्याची वरिष्ठ कार्यालयास माहिती द्यावी. मासिक सभेत फेरफार मंजूर झाल्यास त्याची फेरफार रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी.

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी शहरी भागाजवळ २३ ग्रामपंचायती आहेत. पाच हजार लोकसंख्येपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची संख्या ४५ आहे. खुल्या जागेसाठी खरेदी खताच्या मूल्यांकनाच्या चार टक्क्यानुसार फेरफार शुल्क आकारले जाणार आहे. तर, बांधकाम केलेल्या जागेसाठी दोन टक्के शुल्क असणार आहे. तसेच, उर्वरित ग्रामपंचायती पाच हजार लोकसंख्येच्या आतील आहेत.

७१८ ग्रामपंचायती ५००० लोकसंख्येपेक्षा कमी...जिल्ह्यातील ७१८ ग्रामपंचायती या ५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे तिथे खुल्या जागेसाठी फेरफार शुल्क पाच टक्के, तर बांधकाम केलेल्या जागेसाठी २.५ टक्के फेरफार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

आता फेरफार शुल्क निश्चित...ग्रामपंचायतीत सुसंगतपणा व एकसूत्रता राहण्यासाठी फेरफार करतेवेळी घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे कमी-जास्त फेरफार शुल्क राहणार नाही. त्याचबरोबर हरकती मागविल्यामुळे भविष्यात कुठलेही वाद निर्माण होणार नाहीत. या सूचनांचे ग्रामपंचायतींनी पालन करणे बंधनकारक आहे.- अनमोल सागर, सीईओ.

मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे...ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसूत्रता येण्यासाठी सीईओ अनमोल सागर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचे ग्रामपंचायत, सरपंच, नागरिकांनी पालन करावे.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ.

प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायती २३५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ४५५ हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ७१८

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgram panchayatग्राम पंचायत