शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मोठा बदल, जागेचे वाद टाळण्यासाठी ग्रामपंचायतही मागविणार आता फेरफारवेळी हरकती!

By हरी मोकाशे | Updated: December 22, 2023 19:15 IST

कुठल्याही घराच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ मध्ये करणे बंधनकारक आहे.

लातूर : घरजागेच्या वादावरून नेहमीच वाद होतात. काही वेळेस ही प्रकरणे जिल्हा प्रशासनाबरोबरच न्यायालयापर्यंत पोहोचतात. परिणामी, त्यात वेळ जातो. तसेच, मानसिक ताणही सहन करावा लागतो. अशा प्रकारचे तंटे जिल्ह्यात निर्माण होऊ नयेत म्हणून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आता घरजागेच्या फेरफारची नोंद करतेवेळी हरकती मागविण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत.

कुठल्याही घराच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ मध्ये करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक जागामालक नोंदी करून घेत असतो. दरम्यान, काहीजण अधिकृत वाटणीपत्र, वारसा प्रमाणपत्र, संमतीपत्र, मृत्युपत्र अथवा खरेदीखत केलेले आवश्यक ते कागदपत्र न जोडता ग्रामपंचायतीच्या नमुना नं. ८ वर नोंदी करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेस स्थानिक दबावापोटी नोंदी होतात. मात्र ,तद्नंतर तक्रारी होऊन वाद निर्माण होतात. दरम्यान, अशा तक्रारींचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी नव्याने काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसंगतपणा व सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.

फेरफार अर्जांची होणार पडताळणी...फेरफारसाठीचा अर्ज दाखल झाल्यानंतर ग्रामसेवकाने नोंदवहीत नोंद करून पोहोच देणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतीचा करभरणा केल्याची खात्री करून घ्यावी. अपूर्ण कागदपत्रे असल्यास सात दिवसांत लेखी पत्राद्वारे अर्जदारास कळवावे. फेरफारसाठीची आवश्यक ती कागदपत्रे जोडली असल्यास ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर त्याची माहिती डकवून हरकती मागवाव्यात.

हरकती आल्यास चौकशी करा...फेरफार अर्जासंदर्भात हरकती आल्यास सुनावणी घ्यावी तसेच चौकशी करावी. हरकती नसतील तर अर्ज मासिक सभेत ठेवावा. तद्नंतर कोणी विरोध केल्यास त्याची वरिष्ठ कार्यालयास माहिती द्यावी. मासिक सभेत फेरफार मंजूर झाल्यास त्याची फेरफार रजिस्टरमध्ये नोंद घ्यावी.

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात होणार वाढ...जिल्ह्यात एकूण ७८६ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी शहरी भागाजवळ २३ ग्रामपंचायती आहेत. पाच हजार लोकसंख्येपेक्षा अधिक ग्रामपंचायतींची संख्या ४५ आहे. खुल्या जागेसाठी खरेदी खताच्या मूल्यांकनाच्या चार टक्क्यानुसार फेरफार शुल्क आकारले जाणार आहे. तर, बांधकाम केलेल्या जागेसाठी दोन टक्के शुल्क असणार आहे. तसेच, उर्वरित ग्रामपंचायती पाच हजार लोकसंख्येच्या आतील आहेत.

७१८ ग्रामपंचायती ५००० लोकसंख्येपेक्षा कमी...जिल्ह्यातील ७१८ ग्रामपंचायती या ५ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या आहेत. त्यामुळे तिथे खुल्या जागेसाठी फेरफार शुल्क पाच टक्के, तर बांधकाम केलेल्या जागेसाठी २.५ टक्के फेरफार शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.

आता फेरफार शुल्क निश्चित...ग्रामपंचायतीत सुसंगतपणा व एकसूत्रता राहण्यासाठी फेरफार करतेवेळी घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात काही सूचना केल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे कमी-जास्त फेरफार शुल्क राहणार नाही. त्याचबरोबर हरकती मागविल्यामुळे भविष्यात कुठलेही वाद निर्माण होणार नाहीत. या सूचनांचे ग्रामपंचायतींनी पालन करणे बंधनकारक आहे.- अनमोल सागर, सीईओ.

मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे...ग्रामपंचायतीच्या कारभारात सुसूत्रता येण्यासाठी सीईओ अनमोल सागर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्याचे ग्रामपंचायत, सरपंच, नागरिकांनी पालन करावे.- दत्तात्रय गिरी, डेप्युटी सीईओ.

प्रभावक्षेत्रातील ग्रामपंचायती २३५ हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ४५५ हजारपेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायती ७१८

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रgram panchayatग्राम पंचायत