शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
3
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
4
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
5
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
6
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
7
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
8
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
9
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
10
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
11
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
12
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
13
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
14
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
15
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
16
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
17
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
18
महाड, रोह्यामध्ये महायुतीचे कार्यकर्ते भिडले, रायगड जिल्ह्यात मतदानादरम्यान तुंबळ हाणामारी
19
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
20
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

लातूर पाणी टंचाईवर करणार मात; जलसाठा वाढीसाठी जिल्ह्यात ३८ अमृत सरोवरांची निर्मिती 

By हरी मोकाशे | Updated: August 8, 2022 16:55 IST

केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ७५ जलाशये निर्माण करणे अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे.

लातूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने जिल्ह्यात अमृत सरोवर योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३८ सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जलसाठ्यात वाढ होण्याबरोबर जमिनीत पाणी मुरण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ७५ जलाशये निर्माण करणे अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमाचे अमृत सरोवर योजना असे संबोधले जाते. प्रत्येक सरोवर हे किमान एक एकर आकारमानाचे व किमान १० हजार क्युबिक जलसाठ्याचे आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९३ अमृत सरोवरांची निर्मिती अथवा पुनर्जिवित करण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, मृद व जलसंधारण विभागामार्फत ३८ अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत मनरेगामधून १० अमृत सरोवरांची निर्मिती सुरु आहे. या उपक्रमामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ३८ पैकी १५ आणि निर्माण होत असलेल्या १० अमृत सरोवर स्थळी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी