शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
2
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
3
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
4
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
5
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
6
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
7
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
8
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
9
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
10
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
11
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
12
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
13
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
14
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
15
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
16
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
17
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
18
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
19
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
20
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
Daily Top 2Weekly Top 5

हायवेच्या नालीमुळे लातूर महापालिका प्रशासनाची डोकेदुखी

By आशपाक पठाण | Updated: May 21, 2023 18:41 IST

पावसाळापूर्व स्वच्छता: नालीचा चढउतार काढणार कोण

लातूर: महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व स्वच्छतेची कामे हाती घेतली आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणी स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र, दोन वर्षांपासून रिंगरोडवर असलेली राष्ट्रीय महामार्गाची नाली शहराचे पाणी वाहून नेत नसल्याने जवळपास सात ठिकाणी गटारीच्या पाण्याची दुर्गंधी वाढली आहे. या पाण्याला मार्ग सापडत नसल्याने अनेकांच्या घरात पाणी जाते. कायमस्वरूपी मार्ग निघत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

राजीव गांधी चौकातून पुढे कन्हेरी चौक, महात्मा बसवेश्वर चौक, बाभळगाव नाका, गरूड चौक या राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होऊ नये, म्हणून रस्त्यालगत नाली तयार करण्यात आली आहे. मात्र, सदरील नाली करीत असताना शहरातून गटारीचे वाहणारे पाणी नेमके रिंगरोडच्या नालीतून जाईल की नाही, याबाबतची खातरजमा न करता काम आटोपण्यात आले. मागील दोन वर्षांपासून सात ठिकाणी गटारीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय, पावसाळा किंवा नळाला पाणी आले तरी नालीचे पाणी रस्त्यावर वाहते. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार ओरड करूनही प्रशासन दखल घेत नाही. कधी आयुक्त तर कधी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पाणी निचरा न होणाऱ्या भागाची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. मात्र, अजूनही या पाण्याला मार्ग कसा काढावा, याचा मार्ग मनपा प्रशासनाला निघत नसल्याने गटारीच्या पाण्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.

इथे अडले गटारीचे पाणी...

लातूर शहरातील प्रभाग १३ अंतर्गत असलेल्या रहिम नगर, खाडगाव स्मशानभूमी, खाडगाव चौकातून पुढे हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. रहिम नगर भागात तर जवळपास दोन एक रिकाम्या जागेत जणू शेततळेच झाले आहे. राजीव गांधी चौकातून पुढे बाभळगाव नाका, इस्लामुरा भागात दोन ठिकाणी हायवेच्या नालीची उंची, मनपाच्या नालीला मिळत नसल्याने शहराच्या गटारीच्या पाण्याचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या पाण्याला मार्ग काढणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय, नवीन रेणापूर नाक्याहून पुढे गरुड चौकाकडे जाताना डी मार्टसमोरच्या नाल्याचे पाणीही मुख्य रस्त्यावर वाहते.

...तर हजारो घरात शिरणार पाणी

मनपा प्रशासन पावसाळापूर्व स्वच्छतेत नाल्यातील कचरा काढत आहे. पण ज्या भागात बारा महिने पाण्याचा निचरा होत नाही, तिथे काय उपाययोजना आहेत. इस्लामपुरा, रहिम नगर, खाडगाव स्मशानभूमी आदी भागात नळाचे पाणी आले तरी रस्त्यावर वाहते. पावसाचे पाणी कुठे जाणार अन् मनपा कुठे सोडणार हा मोठा प्रश्न आहे. या पाण्याला तात्काळ मार्ग नाही काढला तर पावसाळ्यात हजारो नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूर