शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

हायवेच्या नालीमुळे लातूर महापालिका प्रशासनाची डोकेदुखी

By आशपाक पठाण | Updated: May 21, 2023 18:41 IST

पावसाळापूर्व स्वच्छता: नालीचा चढउतार काढणार कोण

लातूर: महापालिका प्रशासनाने पावसाळापूर्व स्वच्छतेची कामे हाती घेतली आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणी स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र, दोन वर्षांपासून रिंगरोडवर असलेली राष्ट्रीय महामार्गाची नाली शहराचे पाणी वाहून नेत नसल्याने जवळपास सात ठिकाणी गटारीच्या पाण्याची दुर्गंधी वाढली आहे. या पाण्याला मार्ग सापडत नसल्याने अनेकांच्या घरात पाणी जाते. कायमस्वरूपी मार्ग निघत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

राजीव गांधी चौकातून पुढे कन्हेरी चौक, महात्मा बसवेश्वर चौक, बाभळगाव नाका, गरूड चौक या राष्ट्रीय महामार्गावर पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होऊ नये, म्हणून रस्त्यालगत नाली तयार करण्यात आली आहे. मात्र, सदरील नाली करीत असताना शहरातून गटारीचे वाहणारे पाणी नेमके रिंगरोडच्या नालीतून जाईल की नाही, याबाबतची खातरजमा न करता काम आटोपण्यात आले. मागील दोन वर्षांपासून सात ठिकाणी गटारीच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने त्या भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शिवाय, पावसाळा किंवा नळाला पाणी आले तरी नालीचे पाणी रस्त्यावर वाहते. यासंदर्भात नागरिकांनी वारंवार ओरड करूनही प्रशासन दखल घेत नाही. कधी आयुक्त तर कधी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पाणी निचरा न होणाऱ्या भागाची पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. मात्र, अजूनही या पाण्याला मार्ग कसा काढावा, याचा मार्ग मनपा प्रशासनाला निघत नसल्याने गटारीच्या पाण्याला तळ्याचे स्वरूप आले आहे.

इथे अडले गटारीचे पाणी...

लातूर शहरातील प्रभाग १३ अंतर्गत असलेल्या रहिम नगर, खाडगाव स्मशानभूमी, खाडगाव चौकातून पुढे हाकेच्या अंतरावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत आहे. रहिम नगर भागात तर जवळपास दोन एक रिकाम्या जागेत जणू शेततळेच झाले आहे. राजीव गांधी चौकातून पुढे बाभळगाव नाका, इस्लामुरा भागात दोन ठिकाणी हायवेच्या नालीची उंची, मनपाच्या नालीला मिळत नसल्याने शहराच्या गटारीच्या पाण्याचा प्रश्न दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. या पाण्याला मार्ग काढणार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय, नवीन रेणापूर नाक्याहून पुढे गरुड चौकाकडे जाताना डी मार्टसमोरच्या नाल्याचे पाणीही मुख्य रस्त्यावर वाहते.

...तर हजारो घरात शिरणार पाणी

मनपा प्रशासन पावसाळापूर्व स्वच्छतेत नाल्यातील कचरा काढत आहे. पण ज्या भागात बारा महिने पाण्याचा निचरा होत नाही, तिथे काय उपाययोजना आहेत. इस्लामपुरा, रहिम नगर, खाडगाव स्मशानभूमी आदी भागात नळाचे पाणी आले तरी रस्त्यावर वाहते. पावसाचे पाणी कुठे जाणार अन् मनपा कुठे सोडणार हा मोठा प्रश्न आहे. या पाण्याला तात्काळ मार्ग नाही काढला तर पावसाळ्यात हजारो नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :laturलातूर