शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

Latur: ४० तासांच्या शोधानंतर सापडले वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह ! नातेवाइकांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:12 IST

ओढ्यातील पुलावरून पाणी वाहत असल्याने ऑटोने प्रवास करणारे पाच जण वाहून गेले होते.

- एम.जी. मोमीनजळकोट (जि. लातूर) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. मंगळवारी सकाळी तिरू नदीला पूर आल्याने शेताकडून येणारा २७ वर्षीय तरुण वाहून गेला होता, तसेच रात्री ओढ्यातील पुलावरून पाणी वाहत असल्याने ऑटोने प्रवास करणारे पाच जण वाहून गेले होते. त्यापैकी तिघे बचावले. मात्र, उर्वरित दोघे गायब झाले होते. वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह तब्बल ४० तासांच्या शोध कार्यानंतर गुरुवारी दुपारी १२ वाजता सापडले. मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आक्रोश सुरू केला.

लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेती पिकांची दाणादाण उडाली आहे. नदीकाठच्या शेतीस तलावाचे स्वरूप आले आहे, तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे वाहून जाणाऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक ती मदत देऊन वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जवळपास ४८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

एकुलता एक मुलगाही हिरावलाजळकोट तालुक्यातील तिरुका येथील सुदर्शन केरबा घोणशेट्टी (२७) हा अविवाहित आहे. तो मंगळवारी सकाळी ९ वाजता पशुधनास चारा आणण्यासाठी शेताकडे गेला होता. डोक्यावर चाऱ्याचा भारा घेऊन परतताना पाण्याच्या प्रवाहामुळे तो तिरू नदीपात्रात वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. अखेर गुरुवारी दुपारी १ वाजता त्याचा मृतदेह दोन किमी अंतरावरील नदीपात्रात आढळून आला. त्याच्या पश्चात आई- वडील, एक बहीण असा परिवार आहे. विशेषत: तो एकुलता एक होता.

दीड किमी अंतरावर सापडले दोघांचे मृतदेहजळकोट तालुक्यातील पाटोदा खु.- माळहिप्परगा मार्गावरून चालकासह पाच जण असलेला ॲाटो मंगळवारी रात्री ८ वाजता जात होता. ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांसह हा ऑटो वाहून गेला. दरम्यान, चालक संग्राम सोनकांबळे, विठ्ठल गवळे, बंटी वाघमारे यांना वाचविण्यात यश आले. मात्र, वैभव पुंडलिक गायकवाड (२४, रा. नरसिंगवाडी, ता. उदगीर) व शान ऊर्फ संगीता मुरहरी सूर्यवंशी (३२) हे वाहून गेले. गुरुवारी दुपारी १२ वाजता वैभव गायकवाड व संगीता सूर्यवंशी यांचा मृतदेह दीड किमी अंतरावरील डोंगरगाव साठवण तलाव परिसरात सापडला. वैभव गायकवाड यांच्या पश्चात आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. सूर्यवंशी यांच्या पश्चात आई- वडील असून त्या अविवाहित आहेत.

एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे प्रयत्नपुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या पथकास तसेच अहमदपूर आणि उदगीर येथील अग्निशमन दलाच्या बचाव पथकास पाचारण करण्यात आले होते, तसेच या भागातील पट्टीच्या पोहणाऱ्यांचीही मदत घेण्यात आली, असे तहसील प्रशासनाने सांगितले.

मदतीच्या सूचनापुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांच्या कुटुंबीयांची माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी गुरुवारी भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करून शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ मदत देण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :laturलातूरfloodपूर