शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

Latur: ४० तासांच्या शोधानंतर सापडले वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह ! नातेवाइकांचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:12 IST

ओढ्यातील पुलावरून पाणी वाहत असल्याने ऑटोने प्रवास करणारे पाच जण वाहून गेले होते.

- एम.जी. मोमीनजळकोट (जि. लातूर) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. मंगळवारी सकाळी तिरू नदीला पूर आल्याने शेताकडून येणारा २७ वर्षीय तरुण वाहून गेला होता, तसेच रात्री ओढ्यातील पुलावरून पाणी वाहत असल्याने ऑटोने प्रवास करणारे पाच जण वाहून गेले होते. त्यापैकी तिघे बचावले. मात्र, उर्वरित दोघे गायब झाले होते. वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह तब्बल ४० तासांच्या शोध कार्यानंतर गुरुवारी दुपारी १२ वाजता सापडले. मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आक्रोश सुरू केला.

लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेती पिकांची दाणादाण उडाली आहे. नदीकाठच्या शेतीस तलावाचे स्वरूप आले आहे, तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे वाहून जाणाऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक ती मदत देऊन वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जवळपास ४८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

एकुलता एक मुलगाही हिरावलाजळकोट तालुक्यातील तिरुका येथील सुदर्शन केरबा घोणशेट्टी (२७) हा अविवाहित आहे. तो मंगळवारी सकाळी ९ वाजता पशुधनास चारा आणण्यासाठी शेताकडे गेला होता. डोक्यावर चाऱ्याचा भारा घेऊन परतताना पाण्याच्या प्रवाहामुळे तो तिरू नदीपात्रात वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. अखेर गुरुवारी दुपारी १ वाजता त्याचा मृतदेह दोन किमी अंतरावरील नदीपात्रात आढळून आला. त्याच्या पश्चात आई- वडील, एक बहीण असा परिवार आहे. विशेषत: तो एकुलता एक होता.

दीड किमी अंतरावर सापडले दोघांचे मृतदेहजळकोट तालुक्यातील पाटोदा खु.- माळहिप्परगा मार्गावरून चालकासह पाच जण असलेला ॲाटो मंगळवारी रात्री ८ वाजता जात होता. ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांसह हा ऑटो वाहून गेला. दरम्यान, चालक संग्राम सोनकांबळे, विठ्ठल गवळे, बंटी वाघमारे यांना वाचविण्यात यश आले. मात्र, वैभव पुंडलिक गायकवाड (२४, रा. नरसिंगवाडी, ता. उदगीर) व शान ऊर्फ संगीता मुरहरी सूर्यवंशी (३२) हे वाहून गेले. गुरुवारी दुपारी १२ वाजता वैभव गायकवाड व संगीता सूर्यवंशी यांचा मृतदेह दीड किमी अंतरावरील डोंगरगाव साठवण तलाव परिसरात सापडला. वैभव गायकवाड यांच्या पश्चात आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. सूर्यवंशी यांच्या पश्चात आई- वडील असून त्या अविवाहित आहेत.

एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे प्रयत्नपुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या पथकास तसेच अहमदपूर आणि उदगीर येथील अग्निशमन दलाच्या बचाव पथकास पाचारण करण्यात आले होते, तसेच या भागातील पट्टीच्या पोहणाऱ्यांचीही मदत घेण्यात आली, असे तहसील प्रशासनाने सांगितले.

मदतीच्या सूचनापुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांच्या कुटुंबीयांची माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी गुरुवारी भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करून शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ मदत देण्याच्या सूचना केल्या.

टॅग्स :laturलातूरfloodपूर