शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

लातूर येथील बसस्थानकात वारकऱ्यांचा रात्री उशिरा ठिय्या!

By राजकुमार जोंधळे | Updated: June 10, 2023 05:28 IST

देहू-आळंदीसाठी बस नसल्याने वारकरी ताटकळले

राजकुमार जाेंधळे, लातूर: आषाढी वारीच्या पालखी साेळ्यात सहभागी हाेण्यासाठी देहू-आळंदीकडे निघालेल्या शेकडाे वारकऱ्यांना वेळेवर बस उपलब्ध न झाल्याने, संतत्प वारकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातच ठिय्या आंदाेलन केले. हे आंदाेलन रात्री उशिरापर्यंत सुरु हाेते. दरम्यान, मध्यरात्रीच्यावेळी एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी जादा बसेसची साेय केल्यानंतरच हे आंदाेलन वारकऱ्यांनी मागे घेतले. 

लातूर जिल्ह्यातून माेठ्या प्रमाणावर वारकारी गुरुवार आणि शुक्रवारी देहू-आळंदीकडे रवाना झाले. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नियाेजित वेळापत्रकानुसार फलाटावर लावण्यात आलेल्या लातूर-पुणे बसेसला माेठ्या प्रमाणावर प्रवाशांसह वारकऱ्यांची गर्दी झाली. दर अर्ध्या तासाला फलाटावरुन तीन बसेस पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले. मात्र, बसस्थानकावर शेकडाेंच्या संख्येत वारकारी बसमध्ये जागा मिळाली नसल्याने स्थानकातच ताटकळत थांबले हाेते. 

दरम्यान, जादा बसेसची व्यवस्था करावी, अशी विनंती वारकऱ्यांनी एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना, नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांकडे केली. त्यांच्या मागणीला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने वारकरी संतप्त झाले. या संतप्त वारकऱ्यांनी मग रात्री १० वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातील प्रांगणातच ठिय्या मांडला. ज्ञानाेबा-तुकाराम, श्री संत माउलीचा गजर करत भजन-किर्तनाला प्रारंभ झाला आणि एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा एकच गाेंधळ उडाला. या गाेंधळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

रात्री उशिरा धावल्या जादा बसेस...

जादा बसेस साेडण्याच्या मागणीवर वारकरी रात्री उशिरापर्यंत ठाम हाेते. परिणामी, एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली. याबाबत त्यांनी वरिष्ठांशी बाेलून जादा पाच बसेसची व्यवस्था केली. या जादा बसेसमधून रात्री उशिरा वारकरी देहू-आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाले.  - हनुमंत चपटे, स्थानक प्रमुख, लातूर

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022laturलातूर