शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

गतवर्षीच्या सोयाबीनच्या पीक विम्याचा परतावा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST

जळकोट : गेल्यावर्षी ऐन काढणीवेळी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे पीक विमा परतावा द्यावा, अशी मागणी ...

जळकोट : गेल्यावर्षी ऐन काढणीवेळी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे पीक विमा परतावा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील वांजरवाडा येथील वंचित शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील वांजरवाडा येथील शेतकऱ्यांनी गत खरीप हंगामात सोयाबीनचा पीक विमा भरला होता. पीकनिहाय विमा रकमेचा हप्ता बँकेत तसेच ऑनलाईन भरला होता. शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून परतावा मंजूर करण्यात आला नाही. तालुक्यातील पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी कृषिमंत्री हे वांजरवाडा येथे आले असता, सोयाबीनचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे त्यांना दिसले होते.

त्यामुळे शासकीय नुकसानभरपाईबरोबरच पीक विमा देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, अद्याप पीक विमा मिळाला नाही. शासनाने संबंधित विमा कंपनीला विमा परतावा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संदीपान आगलावे, सोमनाथ ताकबिडे, गोविंद कदम, नागनाथ टेकाळे, धनंजय आगलावे, प्रवीण आगलावे, संदीप शेवटे, ओमकार टाले, चाँद शेख, संभाजी गोरखे, आदी उपस्थित होते.