शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या सोयाबीनच्या पीक विम्याचा परतावा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST

जळकोट : गेल्यावर्षी ऐन काढणीवेळी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे पीक विमा परतावा द्यावा, अशी मागणी ...

जळकोट : गेल्यावर्षी ऐन काढणीवेळी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे पीक विमा परतावा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील वांजरवाडा येथील वंचित शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यातील वांजरवाडा येथील शेतकऱ्यांनी गत खरीप हंगामात सोयाबीनचा पीक विमा भरला होता. पीकनिहाय विमा रकमेचा हप्ता बँकेत तसेच ऑनलाईन भरला होता. शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून परतावा मंजूर करण्यात आला नाही. तालुक्यातील पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी कृषिमंत्री हे वांजरवाडा येथे आले असता, सोयाबीनचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे त्यांना दिसले होते.

त्यामुळे शासकीय नुकसानभरपाईबरोबरच पीक विमा देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, अद्याप पीक विमा मिळाला नाही. शासनाने संबंधित विमा कंपनीला विमा परतावा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संदीपान आगलावे, सोमनाथ ताकबिडे, गोविंद कदम, नागनाथ टेकाळे, धनंजय आगलावे, प्रवीण आगलावे, संदीप शेवटे, ओमकार टाले, चाँद शेख, संभाजी गोरखे, आदी उपस्थित होते.