शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

लाडाची लेक सीमेवर लढणार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:23 IST

लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण १२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा याेजनेंतर्गत एनसीसीमध्ये जवळपास २०० मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यातून आता एनडीए, ...

लातूर शहरासह जिल्ह्यात एकूण १२ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा याेजनेंतर्गत एनसीसीमध्ये जवळपास २०० मुलींना प्रशिक्षण दिले जाते. यातून आता एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात दाखल हाेता येणार आहे. सावित्रीच्या लेकींना आता सीमेवर शत्रूविराेधात लढा देता येणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाने या लेकींना माेठा दिलासा मिळाला आहे.

काय आहे सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल...

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे. आता राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी अर्थात एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. यातून स्थानिक एनसीसीमधील मुलींना आता देशसेवेची संधी मिळणार आहे.

प्रत्येक क्षेत्रात मुलींनाही समान संधी देण्यात आली आहे. याला अपवाद एनडीए हाेते. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाने एनडीएची दारेही आपल्या निकालाने खुली केली आहेत. हा निकाल देशभरातील लाखाे मुलींसाठी दिलासादायक ठरला आहे.

लातूर जिल्ह्यातील २०० मुलींना मिळेल संधी

लातूर शहर आणि जिल्ह्यातील १२ महाविद्यालयात एनसीसी कॅम्प घेतले जातात. यातून जवळपास २०० मुली प्रशिक्षण घेतात. आता या मुलींना सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने एनडीए, आयएमए आणि ओटीए या तीन माध्यमांद्वारे लष्करात भरती हाेता येणार आहे.

लष्करामध्येही मिळणार प्रवेश...

देशाच्या सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने देशभरातील लाखाे मुलींना लष्करात भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून एनडीए अर्थात राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनी, आयएमए आणि ओटीएसरख्या विभागात भरती हाेता येईल. यातून देशसेवा करण्याची संधी आता मुलींना मिळेल.

लेकींनी मानले न्यायालयाचे आभार...

हा निर्णय मुलींसाठी वेगळ्या क्षेत्रात संधी देणारा ठरणार आहे. आजपर्यंत या क्षेत्राची दारे मुलींसाठी बंद हाेती. आता या निकालामुळे एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींना देता येणार आहे. या क्षेत्रात मुली आपले कर्तृत्व सिद्ध करतील. हा विश्वास वाटताे.

सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशभरातील मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबाेधिनीत भरती हाेण्याची संधी मिळणार आहे. यातून आता मुलींना देशसेवा करता येणार आहे. परिणामी, एनसीसीच्या मुलींना निकालातून दिलासा मिळाला आहे.

देशासह जगभरातील विविध क्षेत्रात मुली आज आघाडीवर आहेत. विज्ञान, समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि संशाेधनाच्या क्षेत्रात मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने मुलींनाही एनडीएमध्ये प्रवेश मिळणार आहे. हा निर्णय महत्वाचा आहे.