शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नवीन वसाहत परिसरात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST

पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी बसविल्या येळण्या लातूर : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, पशु, पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, ...

पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी बसविल्या येळण्या

लातूर : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, पशु, पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी सामाजिक संस्थांच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी येळण्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या टेरेसवर पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावे, असे आवाहन पक्षीमित्रांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्कूलबस चालकांना आर्थिक मदत करावी

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या बसेस उभ्या असून, बँकांकडून हप्ता भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने स्कूल बसचालकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

थंड पाण्याच्या जारला मागणी वाढली

लातूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उन्हामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी घरात कुलरचा आधार घेतला आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे थंड पाण्याच्या जारला मागणी वाढली आहे. अनेक जार सेंटरच्या वतीने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात सकाळच्या वेळी घरपोच सेवा दिली जात आहे. त्यामुळे जारच्या दरात वाढ झाली असल्याचे लातूर शहरातील चित्र आहे.

कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पालकांची लगबग

लातूर : राज्य शासनाच्या वतीने आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. जिल्ह्यात २३८ शाळांनी नोंदणी केली होती. राज्यस्तरावर सोडतीत १६०४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संदेश प्राप्त झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालकांची लगबग दिसून येत आहे. यंदा तालुकास्तरावर पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून घ्यावी लागणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

लातूर : शहरानजीक असलेल्या आर्वी, हरंगूळ नवीन वसाहतीमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नियमित वीजबिल भरूनही वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणचा संपर्क क्रमांकही बंद असल्याने गैरसोय होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा, यासाठी महावितरण कार्यालयालाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असून, महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर आरोग्य विभागाचा भर

लातूर : शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंचा आरोग्य विभागाच्या वतीने शोध घेऊन तपासणी केली जात आहे. शहरात महानगरपालिका आणि ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर दिला जात आहे. यासोबतच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होमआयसोलेशनचा पर्याय देण्यात येत असून, होमआयसोलेशनमधील रुग्णांशी दररोज संपर्क साधून आरोग्याची विचारणा केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

रेणापूर नाका परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा

लातूर : रेणापूर नाका ते पाच नंबर चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. अनेकजण या रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदरील कचरा नियमित उचलला जात नसल्याने वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून होत आहे.