शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वसाहत परिसरात सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST

पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी बसविल्या येळण्या लातूर : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, पशु, पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, ...

पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी बसविल्या येळण्या

लातूर : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, पशु, पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी सामाजिक संस्थांच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी येळण्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या टेरेसवर पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावे, असे आवाहन पक्षीमित्रांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्कूलबस चालकांना आर्थिक मदत करावी

लातूर : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या बसेस उभ्या असून, बँकांकडून हप्ता भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने स्कूल बसचालकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.

थंड पाण्याच्या जारला मागणी वाढली

लातूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उन्हामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी घरात कुलरचा आधार घेतला आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे थंड पाण्याच्या जारला मागणी वाढली आहे. अनेक जार सेंटरच्या वतीने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात सकाळच्या वेळी घरपोच सेवा दिली जात आहे. त्यामुळे जारच्या दरात वाढ झाली असल्याचे लातूर शहरातील चित्र आहे.

कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पालकांची लगबग

लातूर : राज्य शासनाच्या वतीने आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. जिल्ह्यात २३८ शाळांनी नोंदणी केली होती. राज्यस्तरावर सोडतीत १६०४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संदेश प्राप्त झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालकांची लगबग दिसून येत आहे. यंदा तालुकास्तरावर पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून घ्यावी लागणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

लातूर : शहरानजीक असलेल्या आर्वी, हरंगूळ नवीन वसाहतीमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नियमित वीजबिल भरूनही वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणचा संपर्क क्रमांकही बंद असल्याने गैरसोय होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा, यासाठी महावितरण कार्यालयालाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असून, महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर आरोग्य विभागाचा भर

लातूर : शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंचा आरोग्य विभागाच्या वतीने शोध घेऊन तपासणी केली जात आहे. शहरात महानगरपालिका आणि ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर दिला जात आहे. यासोबतच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होमआयसोलेशनचा पर्याय देण्यात येत असून, होमआयसोलेशनमधील रुग्णांशी दररोज संपर्क साधून आरोग्याची विचारणा केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

रेणापूर नाका परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा

लातूर : रेणापूर नाका ते पाच नंबर चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. अनेकजण या रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदरील कचरा नियमित उचलला जात नसल्याने वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून होत आहे.