शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

गुडघाभर चिखलामुळे शेतीकडे जाणे झाले कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी ५० वर्षांपासून हाल होत आहेत. पावसाळ्यात तर रस्त्यावर गुडघाभर चिखल होत ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी ५० वर्षांपासून हाल होत आहेत. पावसाळ्यात तर रस्त्यावर गुडघाभर चिखल होत असल्याने बैल- बारदाणा तसेच शेतीची अवजारे घेऊन मशागतीची कामे करण्यासाठी शेताकडे जाणे कठीण होत आहे. त्यामुळे या रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत जात आहे.

दैठणा- सुमठाणा हा पाच किमीचा उदगीर-लातूर मार्गास जोडणारा सर्वात जवळचा रस्ता आहे. परंतु, पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरावस्था होत आहे. पाऊस झाला की रस्त्यावर गुडघाभर चिखल निर्माण होत आहे. त्यामुळे पेरणीनंतर मशागतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, बैलगाडी घेऊन जाणे कठीण होत आहे. गुडघाभर चिखलातून वाट काढताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकडे जावे तरी कसे असा प्रश्न पडत आहे.

या रस्त्याचे अर्ध्यापर्यंतचे खडीकाम झाले आहे. परंतु, अर्ध्या रस्त्यावर केवळ मातीकाम झाले आहे. दैठणा-सताळा या रस्त्याचीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीकडे जाणे शक्य होत नाही. ५० वर्षांपासून दैठण्याच्या शेतकऱ्यांचे रस्त्यासाठी हाल होत आहेत. म्हणून या दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकांतून केली जात आहे.

पशुधनाची मोठ्या प्रमाणात हेळसांड...

गावातील बहुतांश शेतकरी, शेतमजुरांकडे गाय, म्हैस, शेळ्या आदी पशुधन आहे. परंतु, त्यांना पशुधन शेताकडे ने- आण करणे पावसाळ्यात शक्य होत नाही. त्यामुळे पशुधनाचीही मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. अनेक शेतकरी पशुधन घरीच बांधून ठेवत आहेत. या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.

रस्त्याचे काम मंजुरीसाठी प्रस्तावित...

दैठणा- सुमठाणा या पाच किमीच्या रस्त्याचे काम व्हावे म्हणून ग्रामपंचायत कार्यालयाकडून जिल्हा परिषदेकडे ठराव पाठविण्यात आला असून, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुरीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. कामाला मंजुरी मिळताच काम सुरू होईल, असे अभियंता तांदळे यांनी सांगितले.