शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

किल्लारी भूकंपाने देशातील आपत्ती व्यवस्थापनाला गती: शरद पवार

By संदीप शिंदे | Updated: September 30, 2023 14:44 IST

शरद पवार यांचा भूकंपग्रस्त कृती समितीकडून कृतज्ञता गौरव

- सुर्यकांत बाळापूरे

किल्लारी : भूकंपांचा केंद्रबिंदू ठरलेल्या किल्लारीसह लातूर-धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावे विनाशकारी भूकंपाने उद्धस्त झाली. त्या संकटाला भूकंपग्रस्तांनी ज्या धैर्याने तोंड दिले आणि दानशूर संस्था, व्यक्तींनी मदतीचे हात पुढे केले त्यामूळे खेडी, घरे, माणसे उभी राहिली. त्यातून देशाने आपत्ती व्यवस्थापनाचा धडा घेतला. युनो, जागतिक बँकेने दखल घेतली. किंबहूना आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा आणि भविष्यात आलेल्या सर्व संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचे आत्मबळ हे किल्लारी भूकंपातून मिळाले असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी किल्लारीत व्यक्त केले.

भूकंपाला ३० सप्टेंबर रोजी ३० वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून भूकंपग्रस्त ५२ गावातील कृती समितीने संकटकाळात धावून आलेले तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा शनिवारी आयोजिला होता. यावेळी बोलताना खा. शरद पवार म्हणाले, कृतज्ञता ही काम करणाऱ्या संस्था, अधिकारी, व्यक्ती यांच्याप्रति असावी. मी जे काम केले ती जबाबदारी होती. हजारो लोकांनी मदतीचे हात पूढे केले होते. दातृत्व दाखविणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था होत्या. 

भूकंपानंतर दोन तासात शरद पवार किल्लारीकडे...कृतज्ञता सोहळ्यात शरद पवार यांनी आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विसर्जन मिरवणूका झाल्याशिवाय झोपायचे नसते. पावणेचार वाजता परभणीचे विसर्जन झाल्याचा दूरध्वनी पोलीस अधीक्षकांचा आला. त्यानंतर मी झोपण्यासाठी निघालो. तितक्यात ३:५५ वाजता खिडक्यांची तावदाने वाजली. फर्निचर हादरले. भूकंपांची जाणिव झाली. लगेच विचारणा केली. किल्लारी केंद्र असल्याचे कळले. धक्का मोठा होता. लगेच पोहाचयला पाहिजे म्हणून लातूरचे तत्कालीन पालकमंत्री विलासराव देशमुख, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना सोबत घेऊन दोन तासांत किल्लारीकडे निघालो. 

आक्रोश, धुळीने माखलेले गाव...किल्लारीत पोहोचलो तेव्हा आसमंत धुळीने माखला होता. आक्रोश होता. जिकडे-तिकडे प्रेतांचे ढिगारे होते. मन सुन्न झाले. एकट्या जिल्ह्यातील यंत्रणा पुरेशी नव्हती. शेजारच्या जिल्ह्यातून यंत्रणा मागविली. भूकंपग्रस्तांनी साथ दिली, दानशुरांनी मदत केली, संस्था, व्यक्ती पुढे आल्या, असे सांगत खा. शरद पवार यांनी शांतीलाल मुथा यांनी आई-वडील गमावलेल्या शेकडो मुलांचा सांभाळ केला. आपले घर यांनीही अशी अनाथ मुले सांभाळली. यावेळी पवार यांनी मुथा यांचा विशेष गौरव केला. त्यांच्या संस्थेत शिकवून देशात आणि विदेशात उच्च पदावर गेलेल्या भूकंपग्रस्त भागातील किशोर भोसले, बालाजी साठे, माधव माने, बालासाहेब कांबळे या युवकांचाही उल्लेख केला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख होते. तर मंचावर विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खा. सुप्रिया सुळे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील यांची उपस्थिती होती. कृती समितीच्या वतीने सक्षणा सलगर व पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlaturलातूरEarthquakeभूकंप