शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

किल्लारी भूकंपाने देशातील आपत्ती व्यवस्थापनाला गती: शरद पवार

By संदीप शिंदे | Updated: September 30, 2023 14:44 IST

शरद पवार यांचा भूकंपग्रस्त कृती समितीकडून कृतज्ञता गौरव

- सुर्यकांत बाळापूरे

किल्लारी : भूकंपांचा केंद्रबिंदू ठरलेल्या किल्लारीसह लातूर-धाराशिव जिल्ह्यातील ५२ गावे विनाशकारी भूकंपाने उद्धस्त झाली. त्या संकटाला भूकंपग्रस्तांनी ज्या धैर्याने तोंड दिले आणि दानशूर संस्था, व्यक्तींनी मदतीचे हात पुढे केले त्यामूळे खेडी, घरे, माणसे उभी राहिली. त्यातून देशाने आपत्ती व्यवस्थापनाचा धडा घेतला. युनो, जागतिक बँकेने दखल घेतली. किंबहूना आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा आणि भविष्यात आलेल्या सर्व संकटांना धैर्याने सामोरे जाण्याचे आत्मबळ हे किल्लारी भूकंपातून मिळाले असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी किल्लारीत व्यक्त केले.

भूकंपाला ३० सप्टेंबर रोजी ३० वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून भूकंपग्रस्त ५२ गावातील कृती समितीने संकटकाळात धावून आलेले तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा शनिवारी आयोजिला होता. यावेळी बोलताना खा. शरद पवार म्हणाले, कृतज्ञता ही काम करणाऱ्या संस्था, अधिकारी, व्यक्ती यांच्याप्रति असावी. मी जे काम केले ती जबाबदारी होती. हजारो लोकांनी मदतीचे हात पूढे केले होते. दातृत्व दाखविणाऱ्या अनेक व्यक्ती, संस्था होत्या. 

भूकंपानंतर दोन तासात शरद पवार किल्लारीकडे...कृतज्ञता सोहळ्यात शरद पवार यांनी आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विसर्जन मिरवणूका झाल्याशिवाय झोपायचे नसते. पावणेचार वाजता परभणीचे विसर्जन झाल्याचा दूरध्वनी पोलीस अधीक्षकांचा आला. त्यानंतर मी झोपण्यासाठी निघालो. तितक्यात ३:५५ वाजता खिडक्यांची तावदाने वाजली. फर्निचर हादरले. भूकंपांची जाणिव झाली. लगेच विचारणा केली. किल्लारी केंद्र असल्याचे कळले. धक्का मोठा होता. लगेच पोहाचयला पाहिजे म्हणून लातूरचे तत्कालीन पालकमंत्री विलासराव देशमुख, धाराशिवचे पालकमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना सोबत घेऊन दोन तासांत किल्लारीकडे निघालो. 

आक्रोश, धुळीने माखलेले गाव...किल्लारीत पोहोचलो तेव्हा आसमंत धुळीने माखला होता. आक्रोश होता. जिकडे-तिकडे प्रेतांचे ढिगारे होते. मन सुन्न झाले. एकट्या जिल्ह्यातील यंत्रणा पुरेशी नव्हती. शेजारच्या जिल्ह्यातून यंत्रणा मागविली. भूकंपग्रस्तांनी साथ दिली, दानशुरांनी मदत केली, संस्था, व्यक्ती पुढे आल्या, असे सांगत खा. शरद पवार यांनी शांतीलाल मुथा यांनी आई-वडील गमावलेल्या शेकडो मुलांचा सांभाळ केला. आपले घर यांनीही अशी अनाथ मुले सांभाळली. यावेळी पवार यांनी मुथा यांचा विशेष गौरव केला. त्यांच्या संस्थेत शिकवून देशात आणि विदेशात उच्च पदावर गेलेल्या भूकंपग्रस्त भागातील किशोर भोसले, बालाजी साठे, माधव माने, बालासाहेब कांबळे या युवकांचाही उल्लेख केला.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमुख होते. तर मंचावर विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खा. सुप्रिया सुळे, खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी खा. डॉ. गोपाळराव पाटील यांची उपस्थिती होती. कृती समितीच्या वतीने सक्षणा सलगर व पदाधिकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlaturलातूरEarthquakeभूकंप