शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

Killari Earthquake : पुनर्वसनात भारतीय जैन संघटनेचे योगदान, १२०० मुलांच्या जीवनाला दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:25 IST

सारे काही संपले, असे आयुष्य ज्यांच्या वाट्याला आले त्यांनीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेतली. पोरकेपण आलेल्या मुलांना जणू कुटुंबाचे छत्रच भारतीय जैन संघटनेने दिले.

सूर्यकांत बाळापुरे 

किल्लारी (जि़  उस्मानाबाद): प्रलयंकारी भूकंपानंतर लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यांतील हजारो मुले बेघर झाली. कोणाचे वडील गेले, तर कोणाची आई. तर अनेक जणांचे पालकत्वच हिरावले गेले. अशाच १२०० मुलांसमोर भारतीय जैन संघटनेने मदतीचा हात पुढे केला. 

सारे काही संपले, असे आयुष्य ज्यांच्या वाट्याला आले त्यांनीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेतली. पोरकेपण आलेल्या मुलांना जणू कुटुंबाचे छत्रच भारतीय जैन संघटनेने दिले. आज त्यातील अनेकांनी आपले आयुष्य कर्तृत्वाने फुलविले आहे. कोणी संशोधक आहे, कोणी प्राध्यापक झाले आहे, तर कोणी कृषी क्षेत्रात, व्यवसायात स्थिरावले आहे. भूकंपानंतर अनेक संस्था मदतीसाठी धावल्या होत्या. त्यातीलच भारतीय जैन संघटनाही पुढे आली होती. मुलांच्या भवितव्याचा विचार करून ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वांच्या शिक्षणाची सोय केली.  भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा, ‘आपलं घर’चे पन्नालाल सुराणा यांच्यासह कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला. 

आपलं घर आणि एसओएस बालग्राम... च्एसओएस बालग्राम संस्थेनेही अनाथ मुलांना दत्तक घेतले. त्यांना बालग्रामध्ये आई-वडिलांचे छत्र मिळवून दिले. तिथल्या विशेष कुटुंब पद्धतीत मुले रमली. शिकून मोठी झाली. स्वावलंबीही बनली. तसेच राष्ट्र सेवा दल पुरस्कृत नळदुर्गच्या ‘आपलं घर’नेही भूकंपग्रस्त मुलांना आधार दिला. या सर्व संस्थांसह मदतीसाठी धावलेल्या सर्वांचेच ऋण किल्लारी आणि ५२ भूकंपग्रस्त गावकºयांच्या मनात हृदय करून आहेत.

स्वतंत्र पॅकेजसाठी भूकंपग्रस्तांचे साकडे...भूकंपानंतर ५२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. घटनेला २५ वर्षे झाली, मात्र अद्याप अनेक समस्या कायम आहेत. या भागाच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी होत आहे. पुनर्वसित गावांमधील पायाभूत सोयी-सुविधा २५ वर्षांनंतरही तुलनेने सुधारल्या नाहीत़ रस्ते, नाल्या, पथदिवे, घरांची डागडुजी, पाणीपुरवठा योजना अशा प्राथमिक गरजाही पूर्ण करता-करता नाकी नऊ येत आहेत़ शिवाय, पुनर्वसनाच्या वेळी उद्यान, धोबीघाट, दवाखाने, शाळा अशा सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेचाही पूर्णपणे विकास झालेला नाही़ या बाबींची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र पॅकेजची तरतूद करा, या मागणीसाठी भूकंपग्रस्तांची एकजूट झाली आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंप