शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Killari Earthquake : पुनर्वसनात भारतीय जैन संघटनेचे योगदान, १२०० मुलांच्या जीवनाला दिला आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:25 IST

सारे काही संपले, असे आयुष्य ज्यांच्या वाट्याला आले त्यांनीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेतली. पोरकेपण आलेल्या मुलांना जणू कुटुंबाचे छत्रच भारतीय जैन संघटनेने दिले.

सूर्यकांत बाळापुरे 

किल्लारी (जि़  उस्मानाबाद): प्रलयंकारी भूकंपानंतर लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यांतील हजारो मुले बेघर झाली. कोणाचे वडील गेले, तर कोणाची आई. तर अनेक जणांचे पालकत्वच हिरावले गेले. अशाच १२०० मुलांसमोर भारतीय जैन संघटनेने मदतीचा हात पुढे केला. 

सारे काही संपले, असे आयुष्य ज्यांच्या वाट्याला आले त्यांनीही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून भरारी घेतली. पोरकेपण आलेल्या मुलांना जणू कुटुंबाचे छत्रच भारतीय जैन संघटनेने दिले. आज त्यातील अनेकांनी आपले आयुष्य कर्तृत्वाने फुलविले आहे. कोणी संशोधक आहे, कोणी प्राध्यापक झाले आहे, तर कोणी कृषी क्षेत्रात, व्यवसायात स्थिरावले आहे. भूकंपानंतर अनेक संस्था मदतीसाठी धावल्या होत्या. त्यातीलच भारतीय जैन संघटनाही पुढे आली होती. मुलांच्या भवितव्याचा विचार करून ज्यांची इच्छा आहे, त्या सर्वांच्या शिक्षणाची सोय केली.  भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा, ‘आपलं घर’चे पन्नालाल सुराणा यांच्यासह कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला. 

आपलं घर आणि एसओएस बालग्राम... च्एसओएस बालग्राम संस्थेनेही अनाथ मुलांना दत्तक घेतले. त्यांना बालग्रामध्ये आई-वडिलांचे छत्र मिळवून दिले. तिथल्या विशेष कुटुंब पद्धतीत मुले रमली. शिकून मोठी झाली. स्वावलंबीही बनली. तसेच राष्ट्र सेवा दल पुरस्कृत नळदुर्गच्या ‘आपलं घर’नेही भूकंपग्रस्त मुलांना आधार दिला. या सर्व संस्थांसह मदतीसाठी धावलेल्या सर्वांचेच ऋण किल्लारी आणि ५२ भूकंपग्रस्त गावकºयांच्या मनात हृदय करून आहेत.

स्वतंत्र पॅकेजसाठी भूकंपग्रस्तांचे साकडे...भूकंपानंतर ५२ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. घटनेला २५ वर्षे झाली, मात्र अद्याप अनेक समस्या कायम आहेत. या भागाच्या विकासासाठी स्वतंत्र पॅकेजची मागणी होत आहे. पुनर्वसित गावांमधील पायाभूत सोयी-सुविधा २५ वर्षांनंतरही तुलनेने सुधारल्या नाहीत़ रस्ते, नाल्या, पथदिवे, घरांची डागडुजी, पाणीपुरवठा योजना अशा प्राथमिक गरजाही पूर्ण करता-करता नाकी नऊ येत आहेत़ शिवाय, पुनर्वसनाच्या वेळी उद्यान, धोबीघाट, दवाखाने, शाळा अशा सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेचाही पूर्णपणे विकास झालेला नाही़ या बाबींची पूर्तता करण्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र पॅकेजची तरतूद करा, या मागणीसाठी भूकंपग्रस्तांची एकजूट झाली आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंप