शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

Killari Earthquake : अनाथ गणेश बिराजदार यांची आपबिती : भूकंपात कुटुंबातील ९ जणांचा गेला होता बळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:26 IST

Killari Earthquake : मनावरील तो आघात काहीकेल्या मिटेना

बालाजी बिराजदार(लोहारा) जि. उस्मानाबाद  : काही सेकंदात सर्वच नातीगोती पुसून टाकणारा भूकंप काय असतो, हे मला त्या काळरात्री समजले़ अवघ्या क्षणात माझ्या कुटूंबातील ९ जणांचा बळी गेला़ आजोबांच्या आग्रहाखातर घरालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेला असल्याने मी वाचलो़ वाचलो खरे, पण त्यानंतर माझ्या वाट्याला आलेला संघर्ष, पोरकेपणाची भावना, झालेला आघात अजूनही पुसला जात नाही़ ती रात्र आठवली की मन विषन्न होते़ विचारचक्र पूर्णपणे थांबतात़ माझे स्वत्व विसरुन जायला होते, असे क्लेषमय कथन तावशीगड येथील गणेश बिराजदार यांनी केले़

भूकंपाच्या वेळी गणेश बिराजदार ९ वर्षांचे होते़ तोपर्यंत त्यांना भूकंप काय असतो, हे माहितही नव्हते़ त्यांच्या कुटूंबात त्यांच्यासह एकूण ११ जण होते़ त्या काळरात्री सर्वांनी भोजन घेतले अन् घरातच झोपण्यासाठी आपापल्या खोल्यांत गेले़ मात्र, आजोबांनी आग्रह केल्याने गणेश लगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपण्यासाठी गेला़ गाढ झोपेत असतानाच अचानक जमीन गडगडली अन् घर क्षणाधार्थ कोसळले़ घरात झोपलेले आई-वडील, बहीण, भाऊ, चुलते असे ९ जण माती-दगडाच्या ढिगाखाली दबले गेले़ यातून आईला बाहेर निघाली, पण ती गंभीर जखमी झाली होती़ तिला सोलापूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते़ चार दिवसानंतर तिचाही मृत्यू झाला अन् गणेशच्या वाट्याला अनाथाचे जिणे आले़ तोपर्यंत काय चाललंय? हेच कळत नव्हते.

या आघातातून पटकन सावरण्याइतके बालमन प्रगल्भ नव्हते़ काही दिवसांनी भारतीय जैन संघटनेचे काही पदाधिकारी गावात आले़ ते अनाथांना शिक्षणासाठी घेऊन जात होते़ त्यांच्यासमवेत मलाही पाठविण्यात आले़ त्यांच्याच शिकवणीतून मनाला थोडीशी उभारी मिळाली़ लढण्याची जिद्द जागली़ परिस्थितीशी झगडण्याचे बळ अंगी आले़ मात्र, १०वी पूर्ण होताच आजारपण आले़ त्यामुळे गावाकडे भूकंपातून जगलेल्या एका चुलत्यांकडे गणेश वास्तव्यास आले़ येथे राहून कृषी पदविकेचे एक वर्ष पूर्ण केले़ पुढे कौटुंबिक कारणास्तव त्यांच्यापासून वेगळे रहावे लागले़ यानंतर उदतपूर येथील मामाच्या आश्रयाला जावे लागले़ तेथे राहून पदविका पूर्ण केली़ यानंतर अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी उमरगा, बलसूर येथे भटकत रहावे लागले़ कृषी पदविका झाल्याने जागा निघाल्या की अर्ज भरत रहायचे़ नोकरीसाठी राज्यभर भटकण्याची उपेक्षा पदरी आली़ याकाळात आर्थिक अडचणींमुळे उपासपोटी राहण्याची वेळही आली़ तरीही संघर्ष आपल्या पाचवीला पूजल्याचे सांगत, मनाची समजूत काढत अविरत प्रयत्न सुरुच ठेवले़ २००८ मध्ये अखेर आपल्या संघर्षाला यश आले अन् नागपूरमध्ये कृषी सहायक म्हणून निवड झाल्याचे गणेश सांगत होते़ तेथे चार वर्षे नोकरी केल्यानंतर विनंती बदलीने लोहारा तालुक्यातील जेवळी येथे त्यांना पदस्थापना मिळाली़ आता सर्वकाही नेटके सुरु आहे़ मात्र, आपण कितीही संपन्न झालो तरी पोरकेपणाची भावना आपल्याला आपली जागा दाखवतच राहते़ 

कुटुंबाच्या आठवणीने जीव होतो व्याकूळ...भूकंप झाला त्यावेळी गणेश बिराजदार हे केवळ नऊ वर्षांचे होते. भूकंप काय असतो, हे त्यांना माहीतही नव्हते. प्रलयंकारी घटनेत त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मृत्युमुखी पडले. त्यामुळे गणेश बिराजदार अनाथ झाले. आपल्या कुटुंबाची आठवण सांगताना ते म्हणाले, आई-वडिलांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. त्यांचे प्रेम, माया, वात्सल्य याला मी मुकलो आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर