शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Killari Earthquake : अनाथ गणेश बिराजदार यांची आपबिती : भूकंपात कुटुंबातील ९ जणांचा गेला होता बळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:26 IST

Killari Earthquake : मनावरील तो आघात काहीकेल्या मिटेना

बालाजी बिराजदार(लोहारा) जि. उस्मानाबाद  : काही सेकंदात सर्वच नातीगोती पुसून टाकणारा भूकंप काय असतो, हे मला त्या काळरात्री समजले़ अवघ्या क्षणात माझ्या कुटूंबातील ९ जणांचा बळी गेला़ आजोबांच्या आग्रहाखातर घरालगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेला असल्याने मी वाचलो़ वाचलो खरे, पण त्यानंतर माझ्या वाट्याला आलेला संघर्ष, पोरकेपणाची भावना, झालेला आघात अजूनही पुसला जात नाही़ ती रात्र आठवली की मन विषन्न होते़ विचारचक्र पूर्णपणे थांबतात़ माझे स्वत्व विसरुन जायला होते, असे क्लेषमय कथन तावशीगड येथील गणेश बिराजदार यांनी केले़

भूकंपाच्या वेळी गणेश बिराजदार ९ वर्षांचे होते़ तोपर्यंत त्यांना भूकंप काय असतो, हे माहितही नव्हते़ त्यांच्या कुटूंबात त्यांच्यासह एकूण ११ जण होते़ त्या काळरात्री सर्वांनी भोजन घेतले अन् घरातच झोपण्यासाठी आपापल्या खोल्यांत गेले़ मात्र, आजोबांनी आग्रह केल्याने गणेश लगतच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपण्यासाठी गेला़ गाढ झोपेत असतानाच अचानक जमीन गडगडली अन् घर क्षणाधार्थ कोसळले़ घरात झोपलेले आई-वडील, बहीण, भाऊ, चुलते असे ९ जण माती-दगडाच्या ढिगाखाली दबले गेले़ यातून आईला बाहेर निघाली, पण ती गंभीर जखमी झाली होती़ तिला सोलापूरच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते़ चार दिवसानंतर तिचाही मृत्यू झाला अन् गणेशच्या वाट्याला अनाथाचे जिणे आले़ तोपर्यंत काय चाललंय? हेच कळत नव्हते.

या आघातातून पटकन सावरण्याइतके बालमन प्रगल्भ नव्हते़ काही दिवसांनी भारतीय जैन संघटनेचे काही पदाधिकारी गावात आले़ ते अनाथांना शिक्षणासाठी घेऊन जात होते़ त्यांच्यासमवेत मलाही पाठविण्यात आले़ त्यांच्याच शिकवणीतून मनाला थोडीशी उभारी मिळाली़ लढण्याची जिद्द जागली़ परिस्थितीशी झगडण्याचे बळ अंगी आले़ मात्र, १०वी पूर्ण होताच आजारपण आले़ त्यामुळे गावाकडे भूकंपातून जगलेल्या एका चुलत्यांकडे गणेश वास्तव्यास आले़ येथे राहून कृषी पदविकेचे एक वर्ष पूर्ण केले़ पुढे कौटुंबिक कारणास्तव त्यांच्यापासून वेगळे रहावे लागले़ यानंतर उदतपूर येथील मामाच्या आश्रयाला जावे लागले़ तेथे राहून पदविका पूर्ण केली़ यानंतर अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी उमरगा, बलसूर येथे भटकत रहावे लागले़ कृषी पदविका झाल्याने जागा निघाल्या की अर्ज भरत रहायचे़ नोकरीसाठी राज्यभर भटकण्याची उपेक्षा पदरी आली़ याकाळात आर्थिक अडचणींमुळे उपासपोटी राहण्याची वेळही आली़ तरीही संघर्ष आपल्या पाचवीला पूजल्याचे सांगत, मनाची समजूत काढत अविरत प्रयत्न सुरुच ठेवले़ २००८ मध्ये अखेर आपल्या संघर्षाला यश आले अन् नागपूरमध्ये कृषी सहायक म्हणून निवड झाल्याचे गणेश सांगत होते़ तेथे चार वर्षे नोकरी केल्यानंतर विनंती बदलीने लोहारा तालुक्यातील जेवळी येथे त्यांना पदस्थापना मिळाली़ आता सर्वकाही नेटके सुरु आहे़ मात्र, आपण कितीही संपन्न झालो तरी पोरकेपणाची भावना आपल्याला आपली जागा दाखवतच राहते़ 

कुटुंबाच्या आठवणीने जीव होतो व्याकूळ...भूकंप झाला त्यावेळी गणेश बिराजदार हे केवळ नऊ वर्षांचे होते. भूकंप काय असतो, हे त्यांना माहीतही नव्हते. प्रलयंकारी घटनेत त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य मृत्युमुखी पडले. त्यामुळे गणेश बिराजदार अनाथ झाले. आपल्या कुटुंबाची आठवण सांगताना ते म्हणाले, आई-वडिलांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. त्यांचे प्रेम, माया, वात्सल्य याला मी मुकलो आहे.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर