शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Killari Earthquake : २२ हजार भूकंपग्रस्त नोकरीच्या शोधात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:27 IST

Killari Earthquake : समांतर आरक्षणाचा प्रश्न : २५ वर्षांत २,७७५ तरुणांना नोकऱ्या

हणमंत गायकवाड

लातूर : भूकंपग्रस्त भागातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये २ टक्के समांतर आरक्षण लागू केले असले तरी प्रत्यक्षात २५ वर्षांत केवळ २ हजार ७७५ तरुणांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. आजही तब्बल २० ते २२ हजार उच्चशिक्षित तरुण नोकरीच्या शोधात आहेत. ३० सप्टेंबर १९९३च्या पहाटे झालेल्या भूकंपात उस्मानाबाद जिल्ह्यातील २७ आणि लातूर जिल्ह्यातील २५ गावे उद्ध्वस्त झाली. भूकंपग्रस्त म्हणून २६ हजार नागरिकांना प्रमाणपत्र मिळाले. कोल्हापूर, नगर, पुणे जिल्हा परिषदांमध्ये अनेकांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्रावर शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. पाचशे ते सहाशे तरुण पोलीस झाले आहेत. शंभरावर तलाठी आहेत.

समांतर आरक्षणासाठी स्थापित झालेल्या कृती समितीने २००५ पासून २००९ पर्यंत याप्रश्नी चिकाटीने लढा दिला. तरीही समांतर आरक्षणाची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही. १७ नोव्हेंबर १९९४ चा अनुशेष भूकंपग्रस्तांमधून भरावा, अशी मागणी आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या मदत व पुनर्वसन खाते लातूरच्या पालकमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे या प्रस्तावाचा विचार होईल, अशी आशा भूकंपग्रस्तांमधून व्यक्त केली जात आहे.घर खरेदी हस्तांतरणाबाबत पुनवर्सन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप मरवाळे म्हणाले, काही घरांचा अंतर्गत वाद सुरू आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांसोबत बैठक झाली असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. भूकंप झाला त्यादिवशी सकाळी ६ वाजताच शरद पवार किल्लारीत आले. विलासराव देशमुख यांनीही भूकंपग्रस्तांच्या हिताचे निर्णय घेतले. समांतर आरक्षण हा त्यांचाच निर्णय होता.

दुष्काळमुक्त निर्धार कार्यारंभ सोहळाभारतीय जैन संघटनेने लातूर व उस्मानाबाद हे दोन जिल्हे दुष्काळमुक्त करण्यासाठी दत्तक घेतले आहेत़ या दोन्हीही जिल्ह्यांत जलसंधारणाची कामे करून दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे़ त्या अनुषंगाने किल्लारी येथे रविवारी दुपारी या कामांचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा़ शरद पवार अध्यक्षस्थानी असतील.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर