शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

लातूर जिल्ह्यात खरीपाचा पेरा केवळ ८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 17:54 IST

पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत़

ठळक मुद्देपावसाची हुलकावणी चाड्यावरच मूठ स्थिरावली

- आशपाक पठाण  

लातूर : पावसाने हुलकावणी दिल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला आहे़ ४ जुलै पर्यंत जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के खरीपाचा पेरा झाला असून, ९० टक्के शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत़ निलंगा, उदगीर व देवणी तालुक्यातील काही भाग वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 94 मिमी पाऊस झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत शेती करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी जून पर्यंत जमीनी पेरणीयोग्य करून ठेवल्या़ लातूर जिल्ह्यात खरीपाचे एकूण ६ लाख हेक्टर्स क्षेत्र आहे़ यात ८० टक्के पेरा हा सोयाबीनचा केला जातो़ गतवर्षी खरीप आणि रबी हंगाम हातचे गेल्याने यावर्षी तरी लवकर पेरण्या होतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते़ मात्र जिल्ह्यात निलंगा, अंबुलगा, उदगीर, देवणी परिसरात काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे़ मात्र इतर ठिकाणचे शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ खते, बियाणे खरेदी करून शेतकरी पावसाकडे लक्ष देऊन आहेत़ गेल्या १५ दिवसांपासून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना आता पेरणीची चिंता लागली आहे़ जुलै उजाडला तरी जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ ९० टक्के शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ काही शेतकरी किरकोळ ओल असल्याने पावसाच्या आशेवर पेरण्या करीत आहेत़ मात्र आठ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचे अजूनही पुनरागमन झाले नसल्याने पेरण्या केलेले शेतकरीही चिंताग्रस्त आहेत़ 

उदगीर, देवणी, निलंग्यात पेरण्यालातूर जिल्ह्यात खरीपाचे ६ लाख हेक्टर क्षेत्र आहे़ अद्यापपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही़ निलंगा तालुक्यातील अंबुलगा व परिसरात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला़ तसेच देवणी व उदगीर तालुक्यातील काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत़ शिवाय, लातूर, औसा, रेणापूर, चाकूर आदी ठिकाणी तुरळक पेरण्या झाल्या आहेत़ ४ जुलैपर्यंत केवळ ८ ते १० टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ 

ओल पाहून निर्णय घ्याशेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करण्यापूर्वी जमिनीतील ओल तपासून घ्यावी़ किमान ६ इंच तरी ओलावा आवश्यक आहे़ जिल्ह्यात बहुतांश भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये़ काही ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवानुसार पेरण्या केल्या आहेत़ मात्र चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर