शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

लातूर जिल्ह्यात खरीपाचा पेरा केवळ ८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 17:54 IST

पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत़

ठळक मुद्देपावसाची हुलकावणी चाड्यावरच मूठ स्थिरावली

- आशपाक पठाण  

लातूर : पावसाने हुलकावणी दिल्याने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला आहे़ ४ जुलै पर्यंत जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के खरीपाचा पेरा झाला असून, ९० टक्के शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत़ निलंगा, उदगीर व देवणी तालुक्यातील काही भाग वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. दरम्यान, लातूर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 94 मिमी पाऊस झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत शेती करणारे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे संकेत दिल्याने अनेक शेतकऱ्यांनी जून पर्यंत जमीनी पेरणीयोग्य करून ठेवल्या़ लातूर जिल्ह्यात खरीपाचे एकूण ६ लाख हेक्टर्स क्षेत्र आहे़ यात ८० टक्के पेरा हा सोयाबीनचा केला जातो़ गतवर्षी खरीप आणि रबी हंगाम हातचे गेल्याने यावर्षी तरी लवकर पेरण्या होतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते़ मात्र जिल्ह्यात निलंगा, अंबुलगा, उदगीर, देवणी परिसरात काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाल्याने या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे़ मात्र इतर ठिकाणचे शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ खते, बियाणे खरेदी करून शेतकरी पावसाकडे लक्ष देऊन आहेत़ गेल्या १५ दिवसांपासून एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना आता पेरणीची चिंता लागली आहे़ जुलै उजाडला तरी जिल्ह्यात केवळ ८ ते १० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ ९० टक्के शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत़ काही शेतकरी किरकोळ ओल असल्याने पावसाच्या आशेवर पेरण्या करीत आहेत़ मात्र आठ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाचे अजूनही पुनरागमन झाले नसल्याने पेरण्या केलेले शेतकरीही चिंताग्रस्त आहेत़ 

उदगीर, देवणी, निलंग्यात पेरण्यालातूर जिल्ह्यात खरीपाचे ६ लाख हेक्टर क्षेत्र आहे़ अद्यापपर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला नाही़ निलंगा तालुक्यातील अंबुलगा व परिसरात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला़ तसेच देवणी व उदगीर तालुक्यातील काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत़ शिवाय, लातूर, औसा, रेणापूर, चाकूर आदी ठिकाणी तुरळक पेरण्या झाल्या आहेत़ ४ जुलैपर्यंत केवळ ८ ते १० टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ 

ओल पाहून निर्णय घ्याशेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी करण्यापूर्वी जमिनीतील ओल तपासून घ्यावी़ किमान ६ इंच तरी ओलावा आवश्यक आहे़ जिल्ह्यात बहुतांश भागात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये़ काही ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवानुसार पेरण्या केल्या आहेत़ मात्र चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी केले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रlaturलातूर