शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्णत्वाकडे; आंतरमशागतीच्या कामांस वेग

By हरी मोकाशे | Updated: July 5, 2024 17:21 IST

लातूर जिल्ह्यात ९६.३३ टक्के पेरण्या पूर्ण

लातूर : जिल्ह्यात यंदा वेळेवर मृग बरसल्याने आणि त्यानंतर मध्यंतरी आर्द्राचा पाऊस झाल्याने खरीप पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत. आतापर्यंत ९६.३३ टक्के पेरा झाला आहे. दरम्यान, पीकही चांगले उगवल्याने शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात खरीपाचे ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्र आहे. हवामान खात्याने यंदा वेळेवर मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. दरम्यान, मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली. पीकही चांगले उगवू लागले. तद्नंतर पावसाने उघडीप दिल्याने धास्ती वाढली होती. मात्र आर्द्रा नक्षत्राचा पाऊस झाला. त्यामुळे दिलासा मिळाला. शिवाय, रखडलेल्या पेरण्यांनाही वेग आला. जिल्ह्यात आतापर्यंत ९६.३३ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आठवडाभरात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

कडधान्याचा पेरा वाढला...तृणधान्य - ५९४२कडधान्य - ८०१३७गळीतधान्य - ४७५२५०एकूण पेरा - ५७७४७७

जिल्ह्यात सोयाबीनची ११० टक्के पेरणी...पीक - पेरणीसोयाबीन - ४७४८८१तूर - ६७७९१मूग - ६६१०उडीद - ५७२६कापूस - १६१५८तीळ - १३७ज्वारी - १९६

आतापर्यंत सरासरी २३९ मिमी पाऊस...तालुका - पाऊस (मिमी)लातूर - २७३.२औसा - ३०५.४अहमदपूर - १९४.९निलंगा - २४५.६उदगीर - १७४.८चाकूर - २५५.८रेणापूर - ३०७.९देवणी - १८२.८शिरुर अनं. - १९७.०जळकोट - १२५.८एकूण - २३९.८

लातूर, औश्यात १०३ टक्के पेरणी...जिल्ह्यात खरीप पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत. त्यापैकी लातूर आणि औसा तालुक्यात प्रत्येकी १०३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अहमदपूर- ९४.०६, निलंगा - ८९.१४, शिरुर अनंतपाळ - ९४.३४, उदगीर - ९४.१५, चाकूर - ९८.८४, रेणापूर -९९.४५, देवणी - ८५.८८, जळकोट तालुक्यात ९५.७७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वात कमी पेरणी देवणी तालुक्यात झाली आहे.

कोळपणी, खुरपणीत शेतकरी व्यस्त...यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चांगले उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. पीक चांगले उगवले आहे. पिकांत तण दिसत असल्याने शेतकरी कोळपणी, खुरपणीच्या कामांत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी औषधांची फवारणी करीत आहेत.

रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास सल्ला घ्या...यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पीकही चांगले उगवले असून सध्या बहरत आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने धास्ती वाढली होती. दरम्यान, पाऊस झाल्याने कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी.- आर.टी. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर