शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

खरीप हंगामाच्या पेरण्या पूर्णत्वाकडे; आंतरमशागतीच्या कामांस वेग

By हरी मोकाशे | Updated: July 5, 2024 17:21 IST

लातूर जिल्ह्यात ९६.३३ टक्के पेरण्या पूर्ण

लातूर : जिल्ह्यात यंदा वेळेवर मृग बरसल्याने आणि त्यानंतर मध्यंतरी आर्द्राचा पाऊस झाल्याने खरीप पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत. आतापर्यंत ९६.३३ टक्के पेरा झाला आहे. दरम्यान, पीकही चांगले उगवल्याने शेतकरी आंतरमशागतीच्या कामांत व्यस्त असल्याचे पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यात खरीपाचे ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर क्षेत्र आहे. हवामान खात्याने यंदा वेळेवर मान्सूनला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. दरम्यान, मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यास सुरुवात केली. पीकही चांगले उगवू लागले. तद्नंतर पावसाने उघडीप दिल्याने धास्ती वाढली होती. मात्र आर्द्रा नक्षत्राचा पाऊस झाला. त्यामुळे दिलासा मिळाला. शिवाय, रखडलेल्या पेरण्यांनाही वेग आला. जिल्ह्यात आतापर्यंत ९६.३३ टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. आठवडाभरात पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

कडधान्याचा पेरा वाढला...तृणधान्य - ५९४२कडधान्य - ८०१३७गळीतधान्य - ४७५२५०एकूण पेरा - ५७७४७७

जिल्ह्यात सोयाबीनची ११० टक्के पेरणी...पीक - पेरणीसोयाबीन - ४७४८८१तूर - ६७७९१मूग - ६६१०उडीद - ५७२६कापूस - १६१५८तीळ - १३७ज्वारी - १९६

आतापर्यंत सरासरी २३९ मिमी पाऊस...तालुका - पाऊस (मिमी)लातूर - २७३.२औसा - ३०५.४अहमदपूर - १९४.९निलंगा - २४५.६उदगीर - १७४.८चाकूर - २५५.८रेणापूर - ३०७.९देवणी - १८२.८शिरुर अनं. - १९७.०जळकोट - १२५.८एकूण - २३९.८

लातूर, औश्यात १०३ टक्के पेरणी...जिल्ह्यात खरीप पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत. त्यापैकी लातूर आणि औसा तालुक्यात प्रत्येकी १०३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. अहमदपूर- ९४.०६, निलंगा - ८९.१४, शिरुर अनंतपाळ - ९४.३४, उदगीर - ९४.१५, चाकूर - ९८.८४, रेणापूर -९९.४५, देवणी - ८५.८८, जळकोट तालुक्यात ९५.७७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वात कमी पेरणी देवणी तालुक्यात झाली आहे.

कोळपणी, खुरपणीत शेतकरी व्यस्त...यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चांगले उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. पीक चांगले उगवले आहे. पिकांत तण दिसत असल्याने शेतकरी कोळपणी, खुरपणीच्या कामांत व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही ठिकाणी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी औषधांची फवारणी करीत आहेत.

रोगाचा प्रादुर्भाव दिसल्यास सल्ला घ्या...यंदा वेळेवर पाऊस झाल्याने पीकही चांगले उगवले असून सध्या बहरत आहे. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने धास्ती वाढली होती. दरम्यान, पाऊस झाल्याने कोवळ्या पिकांना जीवदान मिळाले. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कृषी विभागाच्या सल्ल्याने औषध फवारणी करावी.- आर.टी. जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर