शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, हे कसले ब्रेक द चेन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST

लातूर : गतवर्षभरात एक-दीड महिनाच व्यवसाय सुरू राहिला. कोरोनाच्या संसर्गामुळे दुकाने बंद ठेवली होती. तरीही साखळी तुटली नाही. आता ...

लातूर : गतवर्षभरात एक-दीड महिनाच व्यवसाय सुरू राहिला. कोरोनाच्या संसर्गामुळे दुकाने बंद ठेवली होती. तरीही साखळी तुटली नाही. आता ‘ब्रेक द चेन’ या अभियानांतर्गत पुन्हा दुकाने बंद ठेवली आहेत. गळ्यातील चेन मोडायची वेळ आली, हे कसले ब्रेक द चेन? अशा संतप्त प्रतिक्रिया व्यापारी कुटुंबातील महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

लातूर शहर व जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे पुन्हा शासनाने जिल्ह्यातील व्यावसायिकांची दुकाने बंद केली आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी कुटुंबातील महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता लाॅकडाऊनच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त झाल्या. व्यवसाय बंद असल्याने घरप्रपंच भागवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. घरभाडे, दुकानभाडे, वीज बिल, कर्जाचे हप्ते, मुलांची फीस, नोकरांचा पगार कसा करायचा, हा प्रश्न तर आहेच. परंतु, घरप्रपंच भागविणे मुश्किलीचे झाले आहे. त्यामुळे शासनाने कोणतेही व्यवसाय बंद न करता कोरोना रोखण्याची मोहीम राबवावी, असा सूर गृहिणींच्या बोलण्यातून निघाला.

दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?

आमचा झेराॅक्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण आहे. व्यवसायासाठी आणि घरासाठी बँकेचे कर्जही काढलेले आहे. मात्र गेल्या वर्षभरात एक ते दीड महिनेच व्यवसाय सुरू राहिला. शाळा-महाविद्यालये नसल्यामुळे व्यवसायही झाला नाही. या कालावधीत आम्ही मुलांचा वाढदिवससुद्धा साजरा करू शकलो नाही.

- अनुराधा बोरा, गृहिणी

कोरोनाला रोखण्यासाठी लाॅकडाऊन हा पर्याय नाही. गेले वर्षभर दुकाने बंद ठेवली. तरी कोरोनाची चेन ब्रेक झाली नाही. आता पुन्हा ब्रेक द चेन अभियानानिमित्त दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. व्यावसायिकांवर ही वाईट वेळ आहे. मुलांचे शिक्षण करू शकत नाही की, घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने फेरविचार करावा. - मेनका लेंढाणे, गृहिणी

शासनाने व्यापाऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे आणि पाहिजे तोपर्यंत लाॅकडाऊन ठेवावा. सध्या दुकाने बंद ठेवल्यामुळे व्यावसायिकांच्या कुटुंबाची अवस्था बिकट झालेली आहे. लाईट बिल, नोकरांचा पगार, मुलांचे शिक्षण, घरप्रपंच भागवताना ओढाताण होत आहे. - मोना गांधी, गृहिणी

आमचा पान शाॅपचा व्यवसाय. त्यामुळे कुटुंब प्रपंचासाठी उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. कोरोना आल्यापासून हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. परिणामी, घरप्रपंच भागविण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नियमांचे पालन करून परवानगी द्यावी. - प्रणिता खेकडे, गृहिणी